येत्या ९ एप्रिल पासून आयपीएल २०२१ चा थरार रंगणार आहे.या स्पर्धेसाठी सर्व संघ कसून सराव देखील करत आहे. या स्पर्धेतील पहिली लढत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांमध्ये रंगणार आहे. आयपीएल स्पर्धेला जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग मानली जाते. याचे कारणही असेच आहे. या स्पर्धेत सहभागी होणारा खेळाडू रातोरात श्रीमंत होऊन जातो. तसेच या स्पर्धेत चांगली कामगिरी करून खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची देखील संधी मिळत असते. अशातच, आयपीएलमधील असेही काही खेळाडू आहेत, ज्यांची क्रिकेट कारकीर्द आयपीएल खेळल्यानंतर संपुष्टात आली.
१) मनप्रीत गोनी : आयपीएलच्या पहिल्याच हंगामात मनप्रीत गोनी याला चेन्नई सुपर किंग्ज संघात खेळण्याची संधी मिळाली होती. या संधीचे सोने करत त्याने १६ सामन्यात १७ गडी बाद केले होते. ६ आयपीएल हंगामात चमकदार कामगिरी करणाऱ्या मनप्रीत गोनीचे आयुष्य तेव्हा बदलले जेव्हा त्याच्या स्वतःच्या आईने त्याच्यावर जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे आरोप केले होते. या घटनेनंतर तो नुकत्याच झालेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०२१ मध्ये झळकला होता.
२)कामरान खान : आयपीएल कारकिर्दीत २००९ आणि २०१० च्या हंगामात राजस्थान रॉयल्स आणि २०११ च्या हंगामात पुणे वॉरियर्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कामरानने ९ आयपीएल सामन्यात ९ गडी बाद केले होते. यासोबतच त्याच्या नावावर, आयपीएलमध्ये पहिली सुपर ओवर फेकण्याचा विक्रम देखील आहे. सध्या क्रिकेटपासून दूर असलेल्या या खेळाडूला कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी शेती करावी लागत आहे.
३)सौरभ तिवारी: आयपीएलमध्ये सौरभ तिवारी सध्या मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधीत्व करतो. हा फलंदाज आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याची फलंदाजी पाहता सर्व जण त्याला झारखंडचा भविष्यातील एमएस धोनी बोलायचे. त्याने आयपीएल कारकिर्दित एकूण ८८ सामने खेळले आहेत. त्याने १३७९ धावा केल्या आहेत. त्याने २००७ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यांनतर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायची संधी मिळाली नाही.
४)परवेज रसूल : आयपीएल २०१३ मध्ये पुणे वॉरियर्स इंडिया आणि २०१४, २०१५ मध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या परवेज रसूलने २०१४ मध्ये भारतीय संघात प्रवेश केला होता. २०१६ मध्ये त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात स्थान दिले होते. परंतु, त्यानंतर तो खेळताना दिसून आला नाही.
५) पॉल वॉलथठी : आयपीएल २०११ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध खेळताना वॉलथठीने ६३ चेंडूत १२० धावांची खेळी केली होती. २००९ आणि २०१० मध्ये त्याने राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर २०११ आणि २०१३ हंगामात त्याने पंजाब संघाकडून खेळताना निराशाजनक कामगिरी केली होती. त्यानंतर तो खेळताना दिसला नाही.
६) मनविंदर बिस्ला : आयपीएल २०११ आणि २०१२ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी या फलंदाजाने ५ सामने खेळले होते. या यष्टीरक्षक फलंदाजाने २०१२ मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी ४८ चेंडूत ८९ धावांची महत्वपूर्ण खेळी करत संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. परंतु या खेळीनंतर त्याला साजेशी कामगिरी करण्यास अपयश आले होते.
७)अभिषेक नायर : आयपीएल २००९ मध्ये झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात अभिषेक नायरने मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. या सामन्यात त्याने १४ चेंडूत ३५ धावांची खेळी केली होती. या खेळी नंतर त्याला एकही मोठी खेळी खेळता आली नाही.
८)स्वप्नील असनोडकर : आयपीएलच्या पहिल्याच हंगामात स्वप्नील असनोडकरने राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या हंगामात त्याने ९ सामन्यात ३११ धावा केल्या होत्या. त्यानंतर पुढील हंगामात त्याला अवघ्या ९८ धावा करण्यात यश आले होते. तसेच २०११ चे आयपीएल हंगाम स्वप्नील असनोडकरसाठी शेवटचे हंगाम ठरले.
९) राहुल शर्मा : आयपीएल २०११ च्या हंगामात फिरकीपटू राहुल शर्माने पुणे वॉरियर्स इंडिया संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या हंगामात त्याने १४ सामन्यात १६ गडी बाद केले होते. यानंतर त्याचे नाव मुंबईमध्ये झालेल्या रेव पार्टीमध्ये समोर आले होते. तसेच त्याला बेल्स पाल्सी हा रोग झाला होता. त्यानंतर तो खेळताना दिसून आला नाही.
१०)केवन कूपर : आयपीएल २०१२ च्या हंगामात वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू खेळाडू केवन कूपरने पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात ३ चेंडूत ११ धावा केल्या होत्या. यानंतर त्याने गोलंदाजी करताना देखील २६ धावा देत ४ गडी बाद केले होते. या कामगिरीच्या जोरावर त्याने सामनावीर पुरस्कार पटकावला होता. या खेळीनंतर त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
अजबच आहे हे तर! फटका चुकला, चेंडू स्टंपला लागला; पण तरीही क्विंटॉन डीकॉक नाबाद
अर्जुन तेंडुलकर आणि पृथ्वी शॉने एकत्र बसून घेतली होती २०११ विश्वचषक फायनलची मजा, फोटो होतोय व्हायरल
आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ धुरंधराची बहीण आहे सौंदर्याची खाण; तिच्यापुढे अनुष्का-नताशाही पडतील फिक्या!