माजी दिग्गज एमएस धोनी याला भारताचा आतापर्यंचा सर्वोत्तम कर्णधार म्हटले जाते. धोनीने ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असली तरी आजही त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. धोनी संघात असताना संघातील सर्व खेळाडू त्याच्या मार्गदर्शनात खेळत असायचे. मात्र,भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री त्याच्यावर एकदा चांगलेच संतापले होते. भारतीय संघाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी खुलासा केला की, संघाच्या बैठकीत एकदा शास्त्रींनी धोनीला चांगलेच सुनावले होते.
भारतीय संघ (Team India) 2018 साली इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका खेळत होता. एमएस धोनी या मालिकेत संघाचा कर्णधार होत आणि दुसऱ्या वनडे सामन्यात धोनीची फलंदाजी खूपच सुमार दिसली. याच पार्श्वभूमीवर रवी शास्त्री (Ravi Shastri) धोनीवर संतापल्याचे आर श्रीधर (R Sridhar) यांच्या ‘कोचिंग बियाँड: माय डेज विथ इंडियन क्रिकेट टीम,’ या आत्मकथेत सांगितले गेले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा दुसरा वनडे सामना ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला होता.
उभय संघांतील या सामन्यात जो रुट (Joe Root) याने शतक ठोकले होते आणि इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 322 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात विजयासाठी भारताला 50 षटकांमध्ये 323 धावा हव्या होत्या. पावरप्लेनंतर भारतीय संघाचा डाव ढासळला. संघाची धावसंख्या एका वेळी 3 बाद 140 धावा होत्या. संघ त्यावेळी धक्कम स्थितीत होता. पण त्यानंतर संघाने लागोपाट विकेट्स गमावल्या आणि धावसंख्या 7 बाद 191 धावा झाली. शेवटच्या 10 षटकांमध्ये भारताला प्रत्येक षटकात 13 धावा आवश्यक होत्या. यावेळी खेळपट्टीवर उपस्थित एमएस धोनी (MS Dhoni) अपेक्षित खेळी करताना दिसला नाही.
या गोष्टीमुळे धोनीवर चिडले रवी शास्त्री
संघाने पुढच्या 5-6 षटकांमध्ये अवघ्या 20 धावा केल्या. धोनी 59 चेंडूत 37 धावा करून बाद झाला. धोनीच्या याच सुमार खेलीमुळे रवी शास्त्रांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट धोनीलाच धारेवर धरले. आर श्रीधर यांच्या पुस्तकात याविषयी सांगितले गेले की, “जेव्हा विराट कोहली आणि सुरेश रैना खेळत होते, तेव्हा संघ भक्कम स्थितीत होता. शेवटच्या 10 षटकांमध्ये धोनीसोबत फलंदाजीला गोलंदाज राहिलो हेत. अशात धोनीने मोठे शॉट्स खेळणे बंद केले. शेवटच्या 10 षटकात प्रत्येक षटकात 13 धावा हव्या होत्या. पुढच्या 6 षटकात आम्ही फक्त 20 धावा केल्या.रवी शास्त्री चिडले होते. आम्ही 86 धावांनी पराभूत झालो, यामुळे शास्त्री नाराज नव्हते. आम्ही लढण्याआदीच हार मनाली, यामुळे ते नाराज होते. लक्ष्य गाठण्यासाठी आम्ही प्रयत्नच केला नाही. मुख्य प्रशिक्षक ही गोष्ट अशीच जाऊ देणार नव्हते.”
बैठकीत रवी शास्त्रींकडून संघाला मिळाली चेतावणी
निर्णायक (तिसरा) सामना हेडिंग्लेमध्ये होणार होता आणि एक दिवस आधी आम्ही संघाची बैठक घेतली. सपोर्ट स्टाफचे सर्व सदस्य आणि संपूर्ण संघ बैठकीसाठी उपस्थित होता. मला माहिती होते की, रवी शास्त्री संघाला खास संदेश देणार आहेत. पुस्ताकत सांगितल्यानुसार शास्त्री बैठकीत म्हणाले, “कोणीही असो, जिंकण्याचा प्रयत्न करण्याआधी हार मनायची नाही. मी संघात असताना असे झालेच नाही पाहिजे. जर कोणी अशी चूक केली, तर तो त्याचा शेवटचा क्रिकेट सामना खेळत असेल. तुम्ही सामन्यात पराभूत होऊ शकता, यात लाज वाटण्यासारखे काहीच नाही, पण अशा पद्धतीने तुम्हा पराभूत होता कामा नये.” (The incident where Ravi Shastri got angry with MS Dhoni was revealed in R Sridhar’s book)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सरफराज शेर, तर छोटा भाऊ सव्वाशेर! मुशीर खानने ठोकलं त्रिशतक, पाडला 30 पेक्षा जास्त चौकारांचा पाऊस
आयसीसीने जाहीर केला 2022 चा सर्वोत्तम टी20 संघ, भारताच्या तिघांना मिळाली संधी, कर्णधार म्हणून…