क्रिकेटविश्वात अनेक खेळाडूंनी असे काही विश्वविक्रम आपल्या नावे नोंदवले आहेत, जे तोडणे कठीणच वाटते. त्यातीलच एक म्हणजे एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५,००० धावांचा टप्पा पार करणे. एकदिवसीय क्रिकेटच्या ५० वर्षांच्या इतिहासात असा विक्रम करणारा केवळ एकच खेळाडू आहे आणि तो म्हणजे क्रिकेटचा ‘गॉड’ सचिन तेंडुलकर.
तेंडुलकरने त्याच्या कारकीर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्यातीलच हा एक विक्रम आहे, जो मोडणे जरा कठीणच. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १८,४२६ धावा केल्या आहेत. त्याचा हा विक्रमही अजूनही अबाधित आहे. परंतु भारतीय संघात असे काही खेळाडू आहेत जे सचिनचा हा विक्रम मोडू शकतात. त्यांच्या खेळण्यातील सातत्यता आणि वय पाहता हे शिलेदार या विक्रमाला आपल्या नावे करू शकतात. त्याच खेळाडूंविषयी आपण येथे पाहणार आहोत.
३) केएल राहुल – केएल राहुल भारतीय संघातील एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. राहुल हा वरच्या फळीतील फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत केवळ ३८ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ३७ डावात ४७.६ च्या सरासरीने १५०९ धावा केल्या आहेत. राहुल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याची अशीच सातत्यपूर्ण कामगिरी राहिल्यास राहुल १५,००० धावांचा टप्पा गाठू शकतो. राहुलने कारकिर्दीत आतापर्यंत ४ शतके आणि ७ अर्धशतके लगावले आहेत आणि तो असाच नियमित खेळत राहिल्यास लवकरच १५,००० धावांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे
२) रोहित शर्मा – भारताचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्मा भारतीय संघाचा मर्यादित षटकांचा उपकर्णधार आहे. रोहितच्या नावेसुद्धा एक विश्वविक्रम आहे, तो म्हणजे एक दिवसीय सामन्यात सर्वात जास्त वैयक्तिक धावसंख्या असलेला खेळाडू. श्रीलंका विरुद्ध २६४ धावा करून रोहितने हा विक्रम प्रस्थापित केला होता. म्हणूनच १५,००० धावांचाही विक्रम तो त्याच्या नावे करू शकतो. रोहितने आतापर्यंत २२७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४९.१३ च्या सरासरीने ९२०५ धावा केल्या आहेत, ज्यात २९ शतके ४३ अर्धशतके आणि ३ द्विशतकांचा समावेश आहे. त्यामुळे रोहीत लवकरच १५,००० धावांचा टप्पा पूर्ण करेल
१) विराट कोहली – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या यादीत पहिल्या स्थानावर आहे. कारण विराट कोहली जगातील काही महान खेळाडूंपैकी एक आहे. त्याने गेल्या काही वर्षांपासून आपल्या कामगिरीत सातत्यपूर्णता राखली आहे. त्यामुळे कोहलीने आतापर्यंत एकूण २५४ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ४३ शतके आणि ६२ अर्धशतकांचा मदतीने ५९.०७ च्या सरासरीने १२,१६९ धावांचा टप्पा गाठला आहे. म्हणून विराट लवकरच १५,००० धावा पूर्ण करून एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याच्या मार्गावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
असे ४ प्रसंग, जेव्हा कसोटी सामन्यात एकाच दिवशी बनल्या होत्या ५०० हून जास्त धावा
मुंबई इंडियनच्या ताफ्यात नव्या भारतीय सदस्याची एंट्री, नावावर आहेत ५००पेक्षा जास्त विकेट्स
केएल राहुलने शेअर केला बिहाइंड द सीन फोटो, ‘त्या’ व्यक्तीने वेधले सर्वांचेच लक्ष