भारतभूमी ही क्रिकेट आणि त्यातही कर्णधारांच्या बाबतीत अतिशय सुजलाम सुफलाम मानली जाते. या यादीत कपिल देव, सौरव गांगुलींपासून आताच्या एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मापर्यंतच्या खेळाडूंचा समावेश होतो.
फलंदाजीत हातखंडा असलेले रोहित शर्मा आणि विराट कोहली हे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये अनुक्रमे मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाचे नेतृत्व करतात. एकीकडे रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने तब्बल 5 वेळा विजेतेपदावर नाव कोरले आहे, दुसरीकडे विराटला अजून एकदाही ही ट्रॉफी जिंकता आलेली नाही.
तसे तर, रोहित आणि विराटच्या नेतृत्त्वाची तुलना ही काही नवीन गोष्ट नाही. पण आज आम्ही या लेखात तुलना न करता, रोहित नेतृत्त्वाच्या बाबतीत विराटपेक्षा कसा उत्कृष्ट आहे, यामागची कारणे सांगणार आहोत.
तर मित्रांनो जाणून घेऊया ती 5 कारणे, ज्यामुळे रोहित शर्मा विराट कोहलीपेक्षा आहे यशस्वी कर्णधार-
5. रोहित शर्मा आपल्या खेळाडूंवर दाखवतो विश्वास, विराट नाही
विराट बऱ्याचदा अंतिम ११ जणांच्या संघात बऱ्याचदा बदल करताना दिसतो. त्यामुळे कदाचित खेळाडूंमध्ये अविश्वासाची भावना निर्माण होण्याची भीती असते. दुसरीकडे रोहित खेळाडूंना संघात कायम करतो. त्यामुळे खेळाडू अधिक विश्वासाने खेळताना दिसू शकतात.
4. विराट कोहली स्वतः निर्णय घेण्यात पडतो कमी
आयपीएलमधील एका सामन्यात रोहितने जयंत यादवला संधी दिली आणि तो निर्णय त्याने स्वतः घेतला होता, जो की पुढे यशस्वी ठरला. त्याचवेळी मुंबई विरुद्धच्या एका सामन्यात विराटने हार्दिक पांड्यासमोर पवन नेगीच्या हातात चेंडू सोपवला होता. वास्तविक त्यावेळी नवदीप सैनीचे एक षटक बाकी होते. परंतु कोहलीने तो निर्णय स्वतःहुन घेतला नव्हता तर आशिष नेहराच्या सल्ल्यानुसार तो निर्णय घेतला होता. त्या षटकात हार्दीकने नेगीला तब्बल 22 धावा चोपल्या होत्या.
3. गरजेपेक्षा जास्त उत्साहित होतो विराट कोहली
आयपीएलच्या प्रत्येक हंगामात विराट गरजेपेक्षा जास्त उत्साहित दिसून येतो. त्याचवेळी रोहित पूर्णपणे शांत दिसून येतो. रोहित मैदानावर असताना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेऊन वावरतो. त्यामुळे गोलंदाजाला देखील पाठबळ मिळते.
4. विराटला आयपीएल ट्रॉफीची मोठी प्रतिक्षा
रोहित आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. तब्बल 5 वेळा रोहितने विजेतेपदावर नाव कोरले आहे आणि 6 वेळा त्याच्या संघाने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली आहे. त्याचवेळी विराटच्या नेतृत्वाखाली बंगलोर संघ फक्त तीन वेळाच अंतिम फेरीत पोहोचला होता. त्यामध्ये सुद्धा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
5. ट्रॉफी जिंकण्यात माहीर आहे रोहित
रोहितने आयपीएल, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि तसेच भारतीय संघाला आशिया चषक यांसारख्या स्पर्धेत विजय मिळवून दिला आहे. त्याचवेळी विराटच्या नेतृत्वाखाली भारत 2014 चा आशिया चषक हारला आहे. तसेच 2017 च्या चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान विरुद्ध भारताला पराभव स्विकारावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
जिद्द असावी तर अशी! पाकिस्तान टी२० संघात वजनदार फलंदाजाची एंट्री, वर्षभरात घटवलं ३० किलो वजन
“टीममध्ये निवड होताच नाश्त्यावरून उठून थेट वडिलांकडे गेलो, सर्वकाही चित्रपटाप्रमाणेच होते”
एकाचं पोट दुखलं, दुसऱ्याची गोलंदाजी नडली; क्रिकेट इतिहासातील एकमेव षटक, ज्यात तिघांनी केली गोलंदाजी