एप्रिल २०२१ च्या सुरुवातीला भारतात आईपीएलच्या सामन्यांना सुरुवात झाली आणि २९ सामन्यांनंतर उर्वरित हंगामास अनिश्चित काळासाठी स्थगिती देण्यात आली. स्थगिती देण्याचे मुख्य कारण म्हणजे काही खेळाडूंचे आणि स्टाफ कर्मचाऱ्यांचे कोरोना बाधित होणे. दिवसेंदिवस आयपीएलमध्ये सहभागी सदस्यांमधील कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसल्याने वेळ न वाया घालवता बीसीसीआयने लगेचच राहिलेला हंगाम स्थगित केला.
यानंतर आईपीएल २०२१ चे उर्वरित सामने कधी आणि केव्हा होतील यावर खूपच चर्चा रंगली होती. अशात बीसीसीआयने नुकतीच विशेष सर्वसाधारण बैठक आयोजित करत राहिलेले ३१ सामने संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला. उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक अजून ठरले नाही परंतु येत्या सेप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत शिल्लक सामन्यांचे आयोजन होण्याची शक्यता आहे. मात्र, अशी काही कारणे आहेत ज्यामुळे युएईमध्येही आयपीएल २०२१ चे आयोजन हे अयशस्वी ठरू शकते. जाणून घेऊयात काय आहेत, यामागील प्रमुख कारणे
३. भारतासारखी परिस्थिती नसणे
इंडियन प्रीमिअर लीग या नावावरुनच समजते की ही लीग भारताशी संबंधित आहे. आतापर्यंत काहीवेळी आयपीएलचे आयोजन भारताबाहेर झाले आहे आणि ते यशस्वीरित्या पारही पडले आहे. अगदी याचप्रमाणे आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने युएईमध्ये यशस्वी पणे होऊ शकतात. परंतु भारतीय क्रिकेट चाहते भारतातील वातावरणाला नक्कीच मिस करतील. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात भलेही प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची परवानगी नव्हती.
परंतु भारतीय क्रिकेटपटू आणि चाहत्यांसाठी मायभूमीतच आयपीएल खेळण्याची एक वेगळीच मजा असते. त्यामुळे उरलेले सामने युएईत झाल्यास चाहते आणि भारतीय खेळाडू भारतातील परिस्थितीची आठवण काढतील.
२. एकसारखीच खेळपट्टी
खेळपट्टी हा क्रिकेटमध्ये सर्वात महत्वाचा भाग असतो. भारतातील खेळपट्टीमुळे सामन्यांवर खूप फरक पडतो. चेन्नईसारख्या खेळपट्टीवर कमी धावा होतात तर मुंबई-दिल्लीसारख्या खेळपट्टीवर जास्त धावांचा पाऊस पडतो. यामुळे प्रेक्षकांनासुद्धा सामने बघायला मज्जा येते. संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये तीनच मैदाने आहेत आणि तीनही अगदी जवळ आहेत. त्यांची खेळपट्टीची रचनासुद्धा अगदी सारखीच आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यात जेमतेम १५०/१६० इतक्या धावा होतात. याउलट जो संघ धावांचा पाठलाग करतो तोच संघ जास्त सामने जिंकतो. त्यामुळे प्रेक्षकवर्ग मोठ्या आकडी धावांच्या सामन्यांचा आनंद घेऊ शकत नाहीत.
१. सतत एकतर्फी सामने होणे
आयीपीएल २०२१ मध्ये २९ सामन्यातच प्रेक्षकांना खूप रोमांचक सामने अनुभवायला मिळाले. त्यात खूप सामने शेवटच्या चेंडूपर्यंत गेले. याउलट आयपीएल २०२०चे युएईतील अधिकतर सामने हे बहुदा एकतर्फी झाले होते. त्यामुळे प्रेक्षकांना तेवढा आनंद घेता आला नव्हता. गेल्यावर्षीचा अंतिम सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगला होता. परंतु, मुंबई संघाने अंतिम सामना एकतर्फी जिंकला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
डोळ्याची पापणी लवण्याआधी यष्टीरक्षकाने उडवली दांडी, व्हिडिओ पाहून आठवेल ‘एमएस धोनी’!
कसोटी चॅम्पियनशीप फायनल: टीम इंडियाचे ‘असे’ ३ निर्णय, ज्यामुळे उंचावतील तुमच्याही भुवया
खेळाडूंची सुरक्षा ते टी२० विश्वचषकाची तयारी; ‘या’ कारणांमुळे युएईत आयपीएल घेण्याचा निर्णय योग्य