भारतीय क्रिकेट संघाने यावर्षीच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन संघाला ऑस्ट्रेलियात जाऊन पराभूत करण्याची किमया केली. ऍडलेड कसोटीत अवघ्या ३६ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर भारतीय संघाने दमदार पुनरागमन केले होते. मेलबर्न व ब्रिस्बेन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत युवा भारतीय संघाने २-१ असा ऐतिहासिक मालिका विजय मिळवला होता. त्यानंतर, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने भारतीय संघ विचलित करण्यात पटाईत आहे असा आरोप केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर त्याला फैलावर घेतल्यानंतर पेनने यू टर्न घेतला आहे.
पेनने केले होते असे वक्तव्य
ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार असलेला टिम पेन याने भारताकडून झालेल्या पराभवबद्दल बोलताना चक्क न पटण्यासारखे कारण दिले. पेन म्हणाला, “भारतीय संघाने आमचे लक्ष विचलित करून ठेवले. भारतीय संघ व्यवस्थापन म्हणाले होते की आम्ही ब्रिस्बेनमध्ये खेळणार नाही. त्यामुळे आम्हाला नक्की माहीत नव्हते की चौथा सामना कोठे होईल. भारतीय संघाबाबत खेळणे यामुळे आव्हानात्मक असते. ते नेहमी प्रतिस्पर्ध्यांना गाफील ठेवतात.”
पेनने घेतला यु टर्न
टीम पेनने हे वक्तव्य केल्यानंतर अनेकांनी त्याला फैलावर घेतले. तसेच, काहींनी त्याच्यावर ताशेरे ओढले. त्यावर प्रतिक्रिया देताना पेन म्हणाला, “मी जे बोललो त्यासोबत हेदेखील म्हणालो होतो की, भारतीय संघाने आम्हाला पराजित केलेले आणि ते विजयाचे हकदार होते. भारतीय प्रेक्षकांनी माझ्यावर टीका केली. त्यांच्यामते, मी पराभवाचे कारण दिले होते.”
भारताने मिळवला होता मालिकाविजय
ऍडलेड येथील पहिल्या कसोटीत लाजीरवाणा पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघ आणि अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मेलबर्न येथील दुसऱ्या कसोटीत व ब्रिस्बेन येथील चौथ्या कसोटीत विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियात मालिका विजय मिळवला. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये कर्णधार टिम पेनला कर्णधार पदावरून हटविण्याची मागणी पुढे आली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
तो पुन्हा आलाय! जोफ्रा आर्चरने केले धडाकेबाज पुनरागमन
आयपीएलमध्ये एकाच षटकात या दोघांनी टाकलेत १० चेंडू, एक जण आहे टी२० दिग्गज
वेस्ट क्रिकेटचा पुढील चार महिन्यांचा कार्यक्रम जाहीर, या संघांशी करणार दोन हात