संपूर्ण जगताचे लक्ष लागून असलेली ऑलिम्पिक स्पर्धा यंदा जपानच्या टोकियो शहरात पार पडणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूमुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात येत होती. मात्र आता अखेर येत्या २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेचा रोमांच रंगणार आहे. तत्पुर्वी कडक उपाय योजनांनतरही ऑलिम्पिकसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांचे निवासस्थान असलेल्या हॉटेलमधील स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
टोकियोतील नैऋत्याकडील भागात हामामत्सु नावाच्या हॉटेलमध्ये ऑलिम्पिक अधिकाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी ब्राझिलचे तब्बल १२ अधिकारी वास्तव्यास आहेत. याच हॉटेलच्या स्टाफमधील ७ कर्मचारी कोरोना संक्रमित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
परंतु कडक बायो बबलमध्येही कोरोना शिरकाव झाला कसा? याबाबतची माहिती अजून मिळू शकली नाही. तसेच हे कोरोनाग्रस्त स्टाफ कर्मचारी आणखी किती जणांच्या संपर्कात आले होते?, हेसुद्धा सध्या अस्पष्ट आहे.
यंंदाच्या टोकियो ऑलिम्पिकसाठी भारताच्या ११९ खेळाडूंसह एकूण २२८ सदस्यीय पथक जपानची राजधानी टोकियोला पाठवले जाणार आहे. या पथकामध्ये ११९ खेळाडूंपैकी ६७ पुरुष आणि ५२ महिलांचा सहभाग आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी याबद्दल माहिती दिली आहे. भारतीय खेळाडू एकूण ८५ स्पर्धांमध्ये सहभाग घेणार आहेत.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये जाणार असलेल्या भारताच्या खेळाडूंचे हे सर्वात मोठे पथक असणार आहे. यापूर्वी रियो ऑलिम्पिक २०१६ मध्ये भारताच्या एकूण ११८ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. बात्रा पुढे म्हणाले की, ‘टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे पहिले पथक १७ जुलैला टोकियोला रवाना होणार आहे. यामध्ये एकूण ९० खेळाडू आणि अधिकारी असणार आहेत.’
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे स्पर्धेदरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षकांना सामने पाहण्याची परवानगी दिलेली नाही. ऑलिम्पिकच्या या स्पर्धेचे आयोजन आपत्कालीन उपाययोजनांअंतर्गत केले जाणार आहे. ही आपत्कालीन उपाययोजना २२ ऑगस्टपर्यंत चालेल.
महत्त्वाच्या बातम्या-
Tokyo Olympic 2020: कर्नाटक सरकारची मोठी घोषणा, सुवर्णपदक विजेत्याला देणार ५ कोटी, तर…
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरलेल्या सर्व भारतीय खेळाडूंची यादी, वाचा एका क्लिकवर