इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल २०२१) तेराव्या हंगामातील एलिमेनेटरचा सामना सोमवारी (११ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. शारजा क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने दिलेले १३९ धावांचे आव्हान कोलकाताने अखेरच्या षटकात पार केले. या पराभवासह बेंगलोर संघ स्पर्धेतून बाहेर पडला. तसेच, हा सामना विराट कोहलीचा बेंगलोरसाठी कर्णधार म्हणून अखेरचा सामना ठरला. या पराभवामुळे विराटच्या नावे एका नकोशा विक्रमाची नोंद झाली.
विना विजेतेपद पटकावता केले सर्वधिक सामन्यात नेतृत्व
एलिमिनेटरमधील पराभवामुळे विराट हा सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करूनही विजेतेपद न मिळवलेला कर्णधार ठरला. त्याने २०१३ पासून आजपर्यंत बेंगलोरचे १४० सामन्यांमध्ये नेतृत्व केले. मात्र, यादरम्यान तो संघाला विजेतेपद मिळवून देऊ शकला नाही. या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग असून, त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्स व किंग्स इलेव्हन पंजाब या संघांचे ५३ सामन्यांमध्ये नेतृत्व केलेले. मुंबई इंडियन्सचे ५१ सामनात नेतृत्व किल्ला सचिन तेंडुलकर या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. तर, राहुल द्रविड (४८) व कुमार संगकारा (४७) सामन्यात नेतृत्व करूनही आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देऊ शकले नव्हते.
अशी राहिली कर्णधार म्हणून कामगिरी
विराट कोहलीने २०१३ मध्ये डॅनियल विटोरीच्या निवृत्तीनंतर बेंगलोरचा कर्णधार म्हणून पदभार स्वीकारला होता. त्याच्या नेतृत्वात बेंगलोरने १७० सामने खेळले. त्यापैकी ६६ सामन्यात संघाला विजय तर, ७० सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. ४ सामन्यांचा मात्र निकाल लागू शकला नव्हता. विराटच्या नेतृत्वात संघाने २०१६ आयपीएलमध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेली.