भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला शुक्रवारपासून (17 मार्च) सुरुवात झाली. स्पर्धेतील पहिला सामना वानखेडे स्टेडिअमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत 5 विकेट्सने सामना खिशात घातला. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत आघाडी घेतली आहे. त्याचवेळी संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज विराट कोहली हा मात्र अपयशी ठरला. वनडे क्रिकेटमध्ये चेस मास्टर नावाने प्रसिद्ध असलेल्या विराटची मागील काही सामन्यांपासून दुसऱ्या डावातील कामगिरी घसरलेली आहे.
मुंबई येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाला 189 धावा विजयासाठी करायच्या होत्या. ईशान किशन स्वस्तात बाद झाल्यानंतर विराट तिसऱ्य क्रमांकावर फलंदाजीला आला. मात्र, त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. मिचेल स्टार्कने केवळ 4 धावांवर त्याला पायचित केले.
विराटच्या नावे वनडे क्रिकेटमध्ये 46 शतकांची नोंद आहे. यातील तब्बल 26 शतके ही धावांचा पाठलाग करताना आली आहेत. मात्र, मागील सात सामन्यांपासून विराट धावांचा पाठलाग करताना अपयशी ठरतोय. या सात सामन्यांमध्ये 9.28 च्या सरासरीने 65 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या ही केवळ 17 राहिलीये. मात्र, दुसऱ्या बाजूने विचार केल्यास मागील पाच डावात प्रथम फलंदाजी करताना त्याची सरासरी 109 अशी शानदार राहिलीये.
या सामन्याचा विचार केल्यास प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला 188 धावांवर रोखले. मिचेल मार्शने 81 धावांची आक्रमक खेळी करत ऑस्ट्रेलिया साठी सर्वाधिक योगदान दिले. भारतासाठी शमी व सिराज यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले. त्यानंतर भारतीय संघ या धावांचा पाठलाग करताना अडचणीत सापडला होता. मात्र, केएल राहुल व रविंद्र जडेजा यांनी शतकी भागीदारी करत विजय साकार केला.
(Virat Kohli Last Seven Innings While Chasing In ODI Average Under 10 He Flop Against Australia)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्या आणि वनडे समीकरण जुळेना! ‘गोल्डन डक’ होत पदरी पडले आणखी एक अपयश
गिलक्रिस्ट नाही, हाच भारतीय जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू, खुद्द ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा खुलासा