कर्णधार म्हणून अखेरच्या सामन्यात विराटची अनोखी ‘फिक्टी’

युएई येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात सोमवारी (८ नोव्हेंबर) भारतीय संघ आपला अखेरचा साखळी सामना खेळत आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेल्या भारतीय संघासाठी हा औपचारिक सामना असेल. या सामन्या बरोबर भारतीय कर्णधार विराट कोहली याचा टी२० कर्णधार म्हणून भारतीय संघासोबतचा प्रवास संपुष्टात येईल. मात्र, त्याबरोबरच तो एक नवा विक्रम आपल्या नावे करेल. कर्णधार … कर्णधार म्हणून अखेरच्या सामन्यात विराटची अनोखी ‘फिक्टी’ वाचन सुरू ठेवा