भारताने पहिल्या टी-20 सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया विरुद्ध 11 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने खास प्रतिक्रिया देत कोणत्या खेळाडूमुळे सामन्यात पुनरागमन करता आले, याबाबत सांगितले आहे.
हार्दिक पंड्याने घेतला सामना पलटून टाकणारा झेल
विराट कोहली म्हणाला, ‘दुसर्या डावात त्यांची सुरुवात खूप चांगली झाली. त्याच्यानंतर यजमान संघाने काही विकेट गमावल्या आणि हेच आपल्यासाठी टी-20 क्रिकेट आहे. ऑस्ट्रेलियात तुम्हाला खेळाच्या शेवटपर्यंत कठोर मेहनत आणि तीव्रता दाखवण्याची गरज असते.’
तसेच नटराजनबाबत बोलताना तो म्हणाला की, ‘तो स्वत: मध्ये खूप सुधारणा करू शकतो.’ विराट पुढे म्हणाला की, ‘दीपक चाहरने चांगली गोलंदाजी केली. मात्र, चहलमुळे सामन्यात पुनरागमन केले. आणि त्याचबरोबर हार्दिक पंड्याचा तो झेल सामना पलटून टाकणारा ठरला.’
या सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरली ती म्हणजे चहलला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि त्याने त्या संधीचे सोने करून दाखवले. पहिल्या डावात भारतीय संघाने जडेजाच्या दमदार खेळीच्या जोरावर 161 धावसंख्येवर मजल मारली. यांच्यानंतर दुसर्या डावात कन्कशन बदली खेळाडू म्हणून आलेल्या चहलने ऑस्ट्रेलियाचे खिंडार पाडण्याची चोख भूमिका पार पाडली.
चहलच्या 25 धावात 3 विकेट्स
चहलने ऑस्ट्रेलियाच्या ऍराॅन फिंच, स्टीव्ह स्मिथ आणि मॅथ्यू वेड यांना तंबूत पाठवत सामन्यावर पकड मजबूत केली. त्याने 4 षटकात 25 धावा देवून 3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे या सामन्यात त्याला ‘सामनावीर’ हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. संघाच्या या विजयानंतर कर्णधार विराट कोहली म्हणाला की, या सामन्यासाठी चहल आमच्या संघाच्या रणनितीचा भाग नव्हता आणि कन्कशन बदली एक अजबच गोष्ट आहे. हे आमच्यासाठी काम करून गेले. त्याने विरोधी संघातील खेळाडूंना आपल्या जाळ्यात अडकवताना गजब गोलंदाजी केली.
केएल राहुलची अर्धशतकीय खेळी
या सामन्यात भारताकडून केएल राहुलने 51 धावांची अर्धशतकीय खेळी साकारली. त्याचबरोबर जडेजाने नाबाद 44 धावांची खेळी करून संघाला 161 धावसंख्येचा टप्पा पार करून दिला. याच्यानंतर नटराजन आणि चहलने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या, तर चाहरने एक विकेट घेत ऑस्ट्रेलिया संघाला रोखण्यात योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘गब्बर’ धवनची जुनी कमजोरी आली समोर; पाहा Video
‘बर्फ खांद्यावर काय करतोय, तो तर ग्लासमध्ये पाहिजे’, दोन जडेजांमधील चर्चेचा Video भन्नाट व्हायरल
भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर नटराजनचा भावूक संदेश, म्हणाला…
ट्रेंडिंग लेख-
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ‘त्या’ पाच ऐतिहासिक खेळ्या; एकटा खेळाडू पडला आख्ख्या संघावर भारी
…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली
गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर