सोमवारी (२६ ऑक्टोबर) बीसीसीआयने येत्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केली. परंतु, ही निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यातही संघ निवडकर्त्यांनी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला मर्यादित षटकांंच्या भारतीय संघातून डच्चू देत अनपेक्षित असा निर्णय घेतला. मात्र माजी भारतीय विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने निवडकर्त्यांच्या या निर्णयाचे पूर्णपणे समर्थन केले आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयने टी२० संघात पंतच्या जागी यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसन आणि केएल राहुल या दोन यष्टीरक्षकांना संधी दिली आहे. त्याचसोबतच वनडे संघात यष्टीरक्षक म्हणून केएल राहुलला निवडण्यात आले आहे.
प्रदर्शनावर काम करण्याची गरज, नाही तर…
क्रिकबझवर पंतविषयी बोलताना सेहवाग म्हणाला की, “या दौऱ्यासाठी पंतची निवड न होणे, ही जास्त आश्चर्याची बाब नव्हती. यापूर्वीच्या न्यूझीलंड दौऱ्यावर देखील तो भारतीय वनडे आणि टी२० संघाच्या अंतिम ११ खेळाडूंचा भाग नव्हता. त्याच्या ऐवजी राहुलला संधी देण्यात आली होती. त्यावेळी राहुलने उत्कृष्टपणे आपली भूमिका साकारली आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघातील यष्टीरक्षक फलंदाजाचे आपले स्थान कायम केले.”
“यावरुन पंतला अप्रत्यक्षपणे संदेश देण्यात आला आहे की, त्याला त्याच्या खेळण्याच्या शैलीत बदल करावे लागणार आहेत. तो आयपीएलच्या तेराव्या हंगामातही लवकर बाद होताना दिसत आहे. त्याला एक चांगला फिनिशर बनावे लागणार आहे. जर पंतने त्याच्या फलंदाजी शैलीवर काम केले नाही, तर त्याला पुढेही संधी मिळण्याची शक्यता कमी आहे,” असे पुढे बोलताना सेहवागने सांगितले.
सेहवागने दिले द्रविडचे उदाहरण
२०१८-१९ सालच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये पंतने एका शतकासह केवळ ३५० धावा केल्या होत्या. यावरुन सेहवागने राहुल द्रविडचे उदाहरण देत सांगितले की, एमएस धोनीचे भारतीय संघात आगमन होण्यापूर्वी भारतीय संघाने द्रविडचा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून पुरेपुर वापर करुन घेतला होता. कारण द्रविडच्या रुपात त्यांना अतिरिक्त फलंदाजीचा पर्याय मिळाला होता.
“आमच्यावेळी द्रविड भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज होता. कारण त्यावेळी एमएस धोनीचे संघात आगमन झाले नव्हते आणि आमच्याकडे दूसरा चांगला यष्टीरक्षकही उपलब्ध नव्हता. पण द्रविडवर यष्टीरक्षकाची कमान सोपवल्यामुळे आम्हाला एक अतिरिक्त फलंदाज मिळाला होता,” असे सेहवागने सांगितले.
पंतला स्वत:लाच निर्माण करावी लागेल संधी
“पण दूसऱ्या बाजूला पंत हा चांगला यष्टीरक्षक जरुर आहे. परंतु, ज्याप्रकारे तो फलंदाजी करताना बाद होतो. त्यावरुन भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याला संधी न देण्याचा विचार केला असावा. आता फक्त पंतच त्याच्या भारतीय संघातील पुनरागमनाचे दरवाजे उघडू शकतो. त्याला जेव्हाही संधी मिळेल, तेव्हा आपल्यातही संघाला चांगला शेवट देण्याची क्षमता आहे, हे त्याला दाखवून द्यावे लागेल,” असे शेवटी बोलताना सेहवागने म्हटले.
टी -२० मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, वरुण चक्रवर्ती
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेट- कीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या बातम्या-
वनडे, टी२० संघातून रिषभ पंतला डच्चू, ‘या’ दोघांना मिळाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विकेटकीपर म्हणून संधी
श्रेयस अय्यरने ‘या’ दोन खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर
‘एका हंगामात खराब कामगिरी केल्याने…’, चेन्नईच्या सीईओचे धोनीबाबत मोठे वक्तव्य
ट्रेंडिंग लेख-
Top-5 Fielding: निकोलस पूरनच्या फिल्डींगला जाँटी ऱ्होड्सचा सलाम; सचिननेही केली आर्चरवर कमेंट
हैदराबादचे ‘हे’ पाच धुरंदर अख्ख्या दिल्लीवर पडले भारी; मिळवला दणदणीत विजय
बीडच्या छोट्याशा गावातील ‘या’ पोरानं क्रिकेटचं मैदान अक्षरशः दणाणून सोडलं