मंगळवारी (२३ मार्च ) पार पडलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील, पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाला ६६ धावांनी पराभूत करत मालिकेत १-० ने पुढाकार घेतला आहे. या सामन्यात भारतीय संघात पदार्पण केलेल्या कृणाल पंड्या आणि प्रसिद्ध कृष्णा खेळाडूंनी विजयात महत्वाची भूमिका बजावली.
कृणाल पंड्याने या सामन्यात ७ व्या क्रमांकावर खेळत अर्धशतकीय खेळी केली आणि केएल राहुलसोबत शतकिय भागीदारी करत भारतीय संघाला ३१७ धावांपर्यंत पोहचवले होते. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने ४ गडी बाद करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या कामगिरीनंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. अशातच माजी भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवागने देखील एक मिम शेअर करत भारतीय संघाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
वीरेंद्र सेहवाग हा सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतो. तसेच तो मिम्स आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन देखील करत असतो. अशातच भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानी चाहत्याचा प्रसिद्ध मिम शेअर केला आहे.
त्या मिमवर “एकदम से वक्त बदल दिया, जजबात बदल दिये, जिंदगी बदल दि”, असे लिहले आहे. तसेच त्याने कॅप्शन म्हणून “इंग्लंड संघ मजबूत स्थितीत होता आणि १४.१ षटकात १३५ धावा केल्या होत्या. तेव्हा लॉर्ड शार्दुल, प्रसिद्ध कृष्णा आणि भुवी आले आणि पूर्ण सामनाच बदलून टाकला,” असे लिहिले आहे.
England going strong at 135/0 after 14.1 overs and then
Lord Shardul , Prasidh Krishna and Bhuvi pic.twitter.com/Tbc4MoAtxp— Virender Sehwag (@virendersehwag) March 23, 2021
यावर चाहत्यांनीही त्याला अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Meanwhile Shardul, Prasidh Krishna. pic.twitter.com/xqzLg6YF16
— N______Pandey (@nitesh___007) March 23, 2021
Lord Shardul
Khali akho se hi Batsman ko dara dete hain pic.twitter.com/E65MPQS3aI
— DRP ???????? (@its_DRP) March 23, 2021
Meanwhile Shardul, Krishna & Bhuvi to
England batsmans after 15 overs – pic.twitter.com/rub5iNdvr1— Aash Mehta (@iamaashmehta) March 23, 2021
Somewhere btw ???????????? pic.twitter.com/62j3ElxefD
— Foko (@whyfokowhy) March 23, 2021
भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या शिखर धवनने या सामन्यात ९८ धावांची खेळी केली होती. तसेच कर्णधार विराट कोहली याने ५६ तर केएल राहुल याने नाबाद ६२ धावांची खेळी केली होती. पदार्पणवीर कृणाल पंड्याने देखील नाबाद ५८ धावांचे योगदान दिले. तसेच राहुल सोबत मिळून त्याने १०८ धावांची भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने ३१७ धावांचा डोंगर उभा करत इंग्लंडला ३१८ धावांचे योगदान दिले.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लिश फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना पूर्णपणे बॅकफूटवर टाकले होते. जेसन रॉय(४६) आणि जॉनी बेअरस्टो(९४) यांनी १४ षटकातच १३५ धावा जोडल्या होत्या. पण त्यांनतर प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांच्या गोलंदाजी समोर इंग्लिश फलंदाजांनी नांगी टाकली. इंग्लंड संघाला ४२.१ षटकात सर्वबाद २५१ धावा करता आल्या. हा सामना भारतीय संघाने ६६ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या –
पहिल्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवल्यानंतर ट्विटरवर ‘लॉर्ड शार्दुल’ ट्रेंड, ‘हे’ आहे कारण
तयारी आयपीएलची! किंग खानच्या केकेआरचे ‘हे’ दोन परदेशी शिलेदार भारतात दाखल, पाहा फोटो