असे भारतीय कर्णधार, जे कधीही कसोटी सामना हारले नाहीत

असे भारतीय कर्णधार, जे कधीही कसोटी सामना हारले नाहीत

अजिंक्य रहाणेने कसोटी कर्णधार म्हणून 6 सामने खेळले असून तो कधीही पराभूत झाला नाही

रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने 4 कसोटी सामने जिंकले आहेत, तर 2 सामने ड्रॉ झाले आहेत

माजी भारतीय क्रिकेटपटू के श्रीकांत यांनीही कर्णधार म्हणून एकही कसोटी सामना गमावलेला नाही

श्रीकांत यांनी 1989 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर भारतीय कसोटी संघाचे नेतृत्त्व केले होते. या मालिकेतील चारही सामने ड्रॉ राहिले होते.

रवी शास्त्रींनीही कर्णधार म्हणून एकही कसोटी सामना गमावलेला नाही.

शास्त्रींनी 1988 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यात नेतृत्व करताना संघाला विजय मिळवून दिला होता