फलंदाजीदरम्यान बांगलादेशचे क्षेत्ररक्षण का लावले? रिषभ पंतने केला खुलासा

फलंदाजीदरम्यान बांगलादेशचे क्षेत्ररक्षण का लावले? रिषभ पंतने केला खुलासा

बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटीदरम्यान रिषभ पंत प्रतिस्पर्धी संघाचे क्षेत्ररक्षण लावताना दिसला होता.

पहिल्या कसोटीनंतर आता पंतने आपण असे करण्यामागचे कारण सांगितले आहे.

पंत म्हणाला की, माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजा यांच्याकडून प्रेरणा घेत आपण असे केले.

अजय जडेजाने पंतला एकदा प्रतिद्वंद्वी किंवा स्थितीची चिंता न करता नेहमी खेळाची गुणवत्ता सुधारण्याचा सल्ला दिला होता.

सामन्यादरम्यान पंतने पाहिले की, बांगलादेशचे खेळाडू एकाच जागी थांबले होते. मिड विकेटवर कोणही उभे नव्हते.

त्यामुळे आपण त्यांना रिकाम्या जागा भरुन काढत तिथेही क्षेत्ररक्षण लावण्याचा सल्ला दिला, असे पंत म्हणाला.