वेस्ट इंडिज क्रिकेटने येत्या बांगलादेश दौऱ्याची पुष्टी केली आहे. यजमान बांगलादेश संघ पाहुणा वेस्ट इंडिज संघासोबत या दौऱ्यावर तीन सामन्यांची वनडे आणि २ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. नववर्षाच्या पहिल्या महिन्यात अर्थातच जानेवारीमध्ये वनडे सामन्याने या दौऱ्याचा श्रीगणेशा होईल. यापूर्वी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने बांगलादेशला हा दौरा छोटा ठेवण्याची विनंती केली होती. बांगलादेशने त्यांच्या विनंतीला मान देत टी२० मालिका रद्द केली आहे.
पुढील वर्षी २० जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान वनडे मालिका खेळली जाईल. पहिले २ सामने ढाका येथे होतील, तर शेवटचा तिसरा सामना चटोग्राममध्ये होईल. त्यानंतर आठवड्यापेक्षा जास्त कालावधीच्या अवकाशानंतर ३ फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेची सुरुवात होईल. चटोग्रामच्या मैदानावरच पहिला कसोटी सामना होईल, तर ढाका येथे दुसऱ्या व अंतिम कसोटी सामन्याची रंगत होईल. ११ फेब्रुवारीला हा दौरा संपेल.
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने घेतला तपास
कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता वेस्ट इंडिजने बोर्डाच्या २ सदस्यांना तपासणीसाठी बांगलादेशला पाठवले होते. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने कोविड-१९साठी आखलेल्या प्रोटोकॉलची तपासणी केल्यानंतर त्या सदस्यांनी या दौऱ्यास संमती दिली. त्यानंतर वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने संघाला या दौऱ्यावर पाठवण्याचा निर्णय घेतला.
महत्त्वाच्या बातम्या-
“बुमराह एकटाच मालिकेत फरक निर्माण करू शकतो”, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केली स्तुती
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी रहाणेला सुखद धक्का; कसोटी क्रमवारीत टॉप-१० मध्ये झेप