भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना रांची येथे खेळला गेला. रांचीच्या जेएससीए स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. न्यूझीलंडने निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून १५३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी अर्धशतक झळकावले. परिणामी भारतीय संघाने ७ गडी राखून सहज विजय नोंदवला. या सामन्यात रिषभ पंतने आपल्या खेळीसोबतच जर्सीने देखील सर्वांना आकर्षित केले होते.
रांची येथील दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या जर्सीच्या उजव्या बाजूला टेप लावण्यात आला होता. याचे कारण म्हणजे, पंत नुकतीच यूएईमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकात वापरलेली जर्सी परिधान करून तो मैदानात उतरला होता. त्या जर्सीवर टी-२० विश्वचषक २०२१ चा लोगो होता. तो लोगो झाकण्यासाठी त्याने ‘टेप’चा वापर केला होता.
द्विपक्षीय मालिकेदरम्यान खेळाडूंना आयसीसीचे लोगो असलेली जर्सी घालण्याची परवानगी नसते. पंत व्यतिरिक्त, बाकीचे खेळाडू योग्य जर्सी घालून आले होते, ज्यावर भारतीय संघाच्या प्रायोजक बायजूसचा लोगो होता.
भारतीय क्रिकेट संघ उपांत्य फेरीपूर्वीच टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला होता. भारतीय संघाने सुपर १२ फेरीतील पाच पैकी तीन सामने जिंकले होते.
तत्पूर्वी, रांची येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडचा ७ गडी राखून पराभव केला. यासह भारताने न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांची मालिका देखील जिंकली आहे. न्यूझीलंडने २० षटकांत ६ गडी गमावून १५३ धावा केल्या होत्या. भारताने हे लक्ष्य १७.२ षटकांत ३ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. भारताकडून सलामीवीर केएल राहुलने सर्वाधिक ६५ धावा केल्या तर कर्णधार रोहित शर्माने ५५ धावांची शानदार खेळी केली. रिषभ पंतने लागोपाठ २ षटकार ठोकून सामना जिंकवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ ३ दिग्गजांकडून चाहत्यांना होत्या खूप अपेक्षा, पण टी२० विश्वचषकात ठरले सपशेल फ्लॉप
देवा, असाच खेळत राहा! चालू सामन्यात प्रेक्षकाची मैदानावर धाव, थेट रोहितपुढे घातला दंडवत-Photo