नवी दिल्ली । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेक कारनामे केले आहेत. त्याची गणना जगातील उत्कृष्ट फलंदाजांमध्ये केली जाते. परंतु विराटच्या कारकिर्दीला एक डाग लागला आहे, तो डाग असा की, त्याच्या नेतृत्वात अजून तरी भारतीय संघाला आयसीसीची एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही.
असे असले तरीही भारतीय संघाचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांनी त्याचे समर्थन केले आहे. तसेच, विराटच्या टीकाकारांनाही चांगलेच फटकारले आहे.
विराटची प्रशंसा करत कपिल यांनी म्हटले, की विश्वचषक जिंकणेच सर्वकाही नसते. जर भारतीय संघ तिन्ही क्रिकेट प्रकारात चांगली कामगिरी करत असेल, तर त्याचे सर्व श्रेय विराटला मिळाले पाहिजे.
माध्यमांशी बोलताना कपिल देव (Kapil Dev) यांनी याबाबत उलगडा करत म्हटले, “सध्याच्या भारतीय संघावर काहीच दबाव नाही. माझे असे मत आहे, की ते चांगली कामगिरी करत आहेत. एक चांगला संघ म्हणवण्यासाठी तुम्हाला विश्वचषक जिंकलेच पाहिजे, असे नाही. विराट चांगले काम करत आहे. सौरव गांगुलीने चांगले कार्य केले होते. आम्ही सुनील गावसकरांनाही विसरू शकत नाही. तेदेखील एक दिग्गज कर्णधार होते. विश्वचषक उंचावणेच सर्वकाही नसते. तुम्ही संघ कसा घडवता, ते सर्वात महत्त्वाचे असते.”
विराटच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली जरी भारतीय संघाला आयसीसीची स्पर्धा जिंकता आलेली नसली तरी विराटच्या नेतृत्वात भारतीय संघ कसोटीत अव्वल क्रमांकावर राहिला होता. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्येच पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचा कारनामाही विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाने केला आहे. याव्यतिरिक्त विराटच्या नेतृत्वात भारताने मायदेशात ११ कसोटी मालिका जिकण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-असे ५ क्रिकेटर, जे आहेत डावखुरे फलंदाज परंतु करतात उजव्या हाताने गोलंदाजी
-श्रीशांत म्हणतो, या स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन संघात परतणार
-माहीचा बड्डे! कॅप्टन कूल धोनीचा बड्डे पोस्टर झालाय रीलिझ, पहा…