भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने २००७ सालच्या आणि २०११सालच्या विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याच्या या विश्वचषकातील जबरदस्त प्रदर्शनामुळे २०१४च्या टी२० विश्वचषकात त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी देण्यात आली होती.
त्यावेळी त्याच्याकडून चाहत्यांच्या अनेक अपेक्षा होत्या. पण, भारतीय संघ अंतिम सामन्यातपर्यंत जाऊनही विश्वचषकात पराभूत झाला होता. त्यावेळी युवराजने श्रीलंकाविरुद्धच्या अंतिम विश्वचषक सामन्यात हळूवार धावा केल्याने चाहत्यांनी त्याच्यावर टिकांचा भडिमार केला होता. युवराजने आता ६ वर्षांनंतर २०१४मधील विश्वचषकाचा अंतिम सामना हारल्यानंतर त्याच्यासोबत झालेल्या घटनेविषयीचा खुलासा केला आहे. Yuvraj Singh Remembers 2014 T20 World Cup Incident.
युवराजने स्पोर्ट्स स्क्रिनच्या यूट्यूब पेजवर बोलताना या गोष्टीचा उलगडा केला आहे. तो म्हणाला की, “मी अंतिम सामन्यातील माझ्या खराब प्रदर्शनाचा पूर्णपणे स्विकार करतो. दुर्भाग्याने मी विश्वचषकातील अंतिम सामन्यातच खूप वाईट खेळलो होतो. त्याऐवजी दुसरा कोणता सामना असता तर जास्त जणांना माझ्या खराब प्रदर्शनामुळे काही फरक पडला नसता.”
“विश्वचषक संपल्यानंतर मी जेव्हा घरी गेलो, तेव्हा मला मी कोणता खलनायक असल्याप्रमाणे वाटत होते. मला अजूनही आठवते की, मी विमानतळामधून बाहेर येत होतो तेव्हा मी हेडफोन लावले होेते आणि तेच माझ्यासाठी खूप चांगले ठरले. कारण, अचानक तिथे मीडियाने मला पूर्णपणे घेरले होते आणि बाजूला जमा झालेले सगळे लोक माझ्याकडे बघून ओरडत होते.”
युवराज पुढे म्हणाला की, “त्यावेळी माझ्या घरावर दगडं मारण्यात आली होती. मी जाताना जसे कोणता अपराधी कुणाला तरी गोळी मारून जेलमध्ये जात आहे, तशा अपराधीप्रमाणे मला वाटत होते. जरी मी त्या परिस्थितीतून स्वत:ला सांभाळले असेल तरी मला अजूनही आठवण आहे की त्या वेळेला मला कसे वाटले होते.”
युवराजने सांगितले की, “त्यादिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने माझी बाजू सांभाळून घेत ट्विट केले होते आणि चाहत्यांनी त्याचे बोलणे ऐकूनही घेतले होते.”
२०१४सालच्या ढाका येथील टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ४ बाद १३० धावा केल्या होत्या. यावेळी युवराज सिंगने २१ चेंडूत फक्त ११ धावा केल्या होत्या आणि भारताने तो सामना ६ विकेट्सने गमावला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
बरोबर वर्षांपुर्वी सीएसकेला धुळ चारत मुंबई इंडियन्स ठरली होती आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम
कोविड १९ पेशंटचे तापमान मोजायला जसे मशीन असते तसे क्रिकेटपटू खोटं…
१० वर्ष सुपर डुपर फ्लाॅप, संघाबाहेरही गेला… पण कमबॅक करत बनला…