जगातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित टी-२० स्पर्धा म्हणजे आयपीएल स्पर्धा. गेल्या अनेक वर्षांत आयपीएलने यशाचे शिखर गाठले आहे. आतापर्यंत आयपीएल चे १२ यशस्वी हंगाम पार पाडले. १३ व्या हंगामाला १९ सेप्टेंबर २०२० पासून सुरुवात होईल. कोरोना विषाणूमुळे हा १३ व हंगाम यूएई मध्ये खेळला जाईल.
सध्या आयपीएलमधील अनेक भारतीय प्रतिभावंत खेळाडू आहेत, जे सध्या राष्ट्रीय संघात खेळतात. आयपीएल स्पर्धेपूर्वी भारतीय संघाकडे गोलंदाजी इतकी मजबूत नव्हती. अनेक वेळा खेळाडू जखमी व्हायचे. तर संघात बर्याच वेळा वेगवान गोलंदाज यायचे आणि फ्लॉप व्हायचे. आयपीएलमुळे आज भारतीय संघात १४५ किमी प्रति तासाच्या वेगाने गोलंदाजी करणारे गोलंदाज आले. जसप्रीत बुमराह, खलील अहमद, नवदीप सैनी इत्यादी आयपीएलचे मधून भारतीय संघाला मिळालेले गोलंदाजीत हिरे आहेत. या सर्वांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने प्रेक्षकांची मने जिंकली आणि निवडकर्त्यांना विचार करायला भाग पाडले.
या लेखामध्ये भारताच्या ४ गोलंदाजांचा उल्लेख आहे ज्यांनी आयपीएलमध्ये पर्पल कॅप जिंकली आहे. त्यापैकी तीन वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज आहेत. पर्पल कॅप ही हंगामातील सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिली जाते.
आयपीएलमध्ये पर्पल कॅप जिंकणारे ४ भारतीय गोलंदाज
१. आरपी सिंग (RP Singh)
आरपी सिंग हा आयपीएलमध्ये पर्पल कॅप जिंकणारा पहिला भारतीय गोलंदाज आहे. २००९ च्या आयपीएलमध्ये त्याला हे यश मिळाले. आरपी सिंगने डेक्कन चार्जर्सकडून खेळत १६ सामन्यांत २३ बळी घेतले. एकदा त्याने ४ बळीही घेतले होते. ७ पेक्षा इकॉनॉमी रेटने आरपी सिंगने धावा दिल्या होत्या. त्याने आयपीएलमध्ये एकूण ८२ सामने खेळले.
२. प्रज्ञान ओझा (Pragyan Ojha)
आयपीएल २०१० मध्ये या फिरकी गोलंदाला पर्पल कॅप मिळाली होती. डेक्कन चार्जर्सकडून खेळताना प्रग्यान ओझाने पर्पल कॅप मिळवली होती. डेक्कन चार्जर्सकडून गोलंदाजांनी सलग दुसऱ्यांदा असा चमत्कार केला. प्रग्यान ओझाने त्यावेळी १६ सामने खेळले आणि २१ बळी घेतले. हा एकमेव फिरकी भारतीय गोलंदाज ज्याने पर्पल कॅप मिळवली होती. तो आयपीएलचे ३ हंगाम खेळला. त्यात तो १ हंगाम डेक्कन चार्जर्स कडून तर २ हंगाम मुंबई इंडियन्स कडून खेळताना दिसला.
३. मोहित शर्मा (Mohit Sharma)
एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळलेल्या मोहित शर्मानेही आयपीएलमध्ये पर्पल कॅप मिळवली होती. २०१४ च्या आयपीएलमध्ये मोहित शर्माला पर्पल कॅप मिळवण्यात यश आले. त्याने एकूण १६ सामने खेळून २३ गडी बाद केले. त्यात एकदा त्याने एका डावात ४ बळीही घेतले. या कामगिरीनंतर त्याने २०१५ चा विश्वचषक देखील खेळला होता. त्याने आतापर्यंत ८५ सामने खेळले असून ९१ बळी मिळवले आहेत.
४. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar)
आयपीएलमध्ये सलग दोन वर्षे पर्पल कॅप जिंकणारा हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे. ड्वेन ब्राव्होनेही दोनदा पर्पल कॅप जिंकली होती. परंतु भुवनेश्वर कुमारने सलग दोन वर्ष पर्पल कॅप जिंकली. सन २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना त्याने १७ सामन्यांत २३ बळी घेतले. यानंतर, पुढच्या वर्षी पुन्हा १४ सामने खेळत २६ बळी घेतले. यावेळी त्याने एका डावात ५ बळीही घेतले. आतापर्यंत त्याने ११७ सामने खेळले असून १३३ बळी घेतले आहेत.