---Advertisement---

आयपीएलमध्ये राजस्थान संघावर मॅच फिक्सिंगचा आरोप, कोणत्या खुलाशामुळे उडाली खळबळ ?

RR
---Advertisement---

लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध जिंकता- जिंकता गमावलेल्या सामन्यानंतर राजस्थान रॉयल्स संघावर मॅच फिक्सिंगचा आरोप करण्यात आला आहे. या सामन्यात राजस्थानला जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात 9 धावांची गरज होती. पण आवेश खानच्या या षटकात राजस्थान फक्त 6 धावा करू शकला. राजस्थान क्रिकेट असोसिएशन एड-हॉक कमिटीचे संयोजक जयदीप बिहानी यांनी संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान संघावर मॅच फिक्सिंगचा आरोप केला आहे.

बिहानी यांनी राजस्थान संघावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार संजू सॅमसन आहेत. बिहानी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, सरकारद्वारे नियुक्त एड-हॉक समितीचे आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाच्या विषयांवर नियंत्रण का नाही.

न्यूज 18 राजस्थानशी बोलताना जयदीप बिहानी यांनी लखनऊ विरुद्ध शेवटच्या षटकात सामना गमावल्यामुळे राजस्थानवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, आम्ही आशा करतो की सर्व स्पर्धा कोणत्याही अडचणी शिवाय संपन्न व्हावी. पण जशी आयपीएल स्पर्धा आली, तेव्हा जिल्हा परिषदेने याचे नियंत्रण आमच्याकडे सोपवले. आयपीएलसाठी बीसीसीआयने आधी आरसीएला पत्र पाठवलं होतं, जिल्हा परिषदेला नाही. त्यांच्याकडून आणि राजस्थान रॉयल्स कडून देण्यात आलेल खोटं कारण हे आहे की, आमच्याकडे सवाई मानसिंग स्टेडियम एमओयु नाही, जर एमओयु नसेल तर काय झालं? तुम्ही प्रत्येक सामन्यासाठी जिल्हा परिषदेला परतफेड करत नाही आहात.

राजस्थान संघाने सलग दोनदा जिंकलेला सामना त्यांच्या हातातून घालवला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---