यंदाच्या आयपीएल हंगामातील (Indian Premier League 2025) 38वा सामना रविवारी (20 एप्रिल) चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (MI vs CSK) संघात खेळला गेला. या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने 9 विकेट्सने शानदार विजय मिळवला. चेन्नईच्या पराभवामुळे त्यांचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे रस्ते अधिकच कठीण झाले आहेत. चेन्नईला यंदाच्या हंगामात 8 पैकी 6 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावर आता माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडूने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचा असा विश्वास आहे की यावेळी चेन्नई सुपर किंग्जला (CSK) पुनरागमन करणे जवळजवळ अशक्य आहे.
चेन्नईचा संघ आता ते गुणतालिकेत तळाशी आहेत. पुन्हा एकदा सीएसकेची सुरुवात चांगली झाली नाही, परंतु सीएसकडे पदार्पण करणाऱ्या आयुष म्हात्रेने 15 चेंडूत 32 धावा करून काही आशा निर्माण केल्या. त्याने 2 षटकारांसह 4 चौकार मारले. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे यांनी अर्धशतके झळकावत संघाला निर्धारित २० षटकांत 5 बाद 176 धावांपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरात, रोहित शर्माने (Rohit Sharma) शानदार नाबाद 76 धावा केल्या, ज्यामध्ये 6 षटकारांसह 4 चौकारांचा समावेश होता. त्याच्यासोबत सूर्यकुमार यादवनेही (Suryakumar Yadav) 30 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या आणि मुंबई इंडियन्सने हे लक्ष्य अवघ्या 15.4 षटकांत पूर्ण केले.
अंबाती रायुडूने जिओहॉटस्टारवर म्हटले की, मला वाटत नाही की सीएसके या हंगामात पुनरागमन करू शकेल. धोनीने स्वतः सामन्यानंतर सांगितले की, आता तो पुढील हंगामाची तयारी करण्याचा विचार करत आहे. आता, तो तरुण खेळाडूंना संधी देऊ इच्छितो आणि असा संघ तयार करू इच्छितो जो निर्भयपणे खेळेल पण निष्काळजीपणे नाही. संघाला अधिक सकारात्मक मानसिकतेने खेळावे लागेल. कदाचित आयुष म्हात्रे सारख्या खेळाडूला आता पूर्ण संधी दिल्या पाहिजेत. सीएसकेच्या पराभवाबद्दल रायुडू म्हणाले की, संघाच्या खेळण्याच्या शैलीत उत्साह आणि विचारसरणीचा अभाव होता.
रायुडू म्हणाला, “मधल्या षटकांमध्ये, त्यांनी सुमारे 7 षटकांत फक्त 35 धावा केल्या. आजकाल, टी20 क्रिकेटमध्ये कोणीही इतके संथ खेळ खेळत नाही. खेळ खूप बदलला आहे आणि मधल्या षटकांमध्येही जलद धावा काढणे महत्त्वाचे आहे. सीएसकेने कोणताही हेतू दाखवला नाही. सामना हरणे ही मोठी गोष्ट नाही, पण लढणे आवश्यक आहे. मधल्या षटकांमध्ये वेळ मारून नेण्याचा विचारही तुम्ही करू शकत नाही. या खेळपट्टीवर जिंकण्यासाठी किमान 190 धावांची आवश्यकता होती आणि सीएसकेला मिळालेली धावसंख्या सरासरीपेक्षा कमी होतr.”