भारत आणि श्रीलंका यांच्यात सध्या 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना 2 ऑगस्ट रोजी कोलंबो येथे खेळला जातोय. मात्र तुम्हाला माहित आहे का की, श्रीलंकेनं भारताविरुद्ध शेवटची एकदिवसीय मालिका कधी जिंकली होती. नाही ना, तर हे जाणून घेण्यासाठी ही बातमी संपूर्ण वाचा.
श्रीलंकेनं भारताविरुद्ध शेवटची एकदिवसीय मालिका तब्बल 27 वर्षांपूर्वी म्हणजेच 1997 मध्ये जिंकली होती. तेव्हापासून श्रीलंकेचा संघ भारताला एकाही एकदिवसीय मालिकेत हरवू शकलेला नाही. भारत आणि श्रींलकेत 1997 मध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यात आली होती. या मालिकेत श्रीलंकेनं भारताला धोबीपछाड दिला होता. त्या मालिकेनंतर भारत आणि श्रीलंकेत आतापर्यंत एकूण 10 एकदिवसीय मालिका खेळण्यात आल्या आहेत. मात्र श्रीलंकेचा संघ एकही मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला नाही.
विशेष म्हणजे, शेवटच्या वेळी जेव्हा श्रीलंकेनं भारताविरुद्ध वनडे मालिका जिंकली होती, तेव्हा सचिन तेंडुलकरचे केवळ 25 शतक झाले होते. त्यावेळी साैरव गांगुलीनं कर्णधार म्हणून पदार्पण केलं नव्हतं. तसेच रोहित शर्मा आणि विराट कोहली त्यावेळी शाळेत होते, तर सध्याचा उपकर्णधार शुबमन गिलचा जन्मही झाला नव्हता!
एकदिवसीय मालिकेपूर्वी भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळण्यात आली होती. या मालिकेत भारतानं 3-0 असा निर्भेळ विजय मिळवला. सध्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. त्यानंतर मालिकेतील दुसरा सामना 4 ऑगस्ट रोजी तर तिसरा सामना 7 ऑगस्ट रोजी खेळला जाईल. या मालिकेतील तिनही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरू होणार आहेत.
हेही वाचा –
राहुल द्रविड बनतील इंग्लंडचे नवे मुख्य प्रशिक्षक? विश्वचषक विजेत्या कर्णधाराचं वक्तव्य चर्चेत
IND vs SL: कर्णधार रोहित शर्माचा मोठा निर्णय, पहिल्याच सामन्यातून मॅचविनर खेळाडूचा पत्ता कट!
पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी काळ्या पट्ट्या का बांधल्या होत्या? बीसीसीआयने दिले मोठे कारण