---Advertisement---

पहलगाम हल्ल्यावर आफ्रिदीचा घाणेरडा सूर, पार केली सभ्यतेची सीमा

Shahid afridi
---Advertisement---

जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये (22 एप्रिल) रोजी दहशतवाद्यांनी 26 निष्पाप लोकांचा जीव घेतला.
या हल्ल्यानंतर संपूर्ण भारत देशामध्ये दुःखाचं तसेच संतापाचे वातावरण आहे. तत्पूर्वी पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीने एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्याने भारताच्या इंडियन आर्मी विरुद्ध घाणेरडं वक्तव्य केलेलं आहे. शाहिद आफ्रिदीने पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी भारतीय सैनिकांना जबाबदार ठरवले आहे, त्याने भारताच्या इंडियन आर्मीला बेकार म्हटले आहे.

शाहिद आफ्रिदीने समा टीव्हीवर बोलताना सर्व सीमा पार केल्या आहेत. झालेल्या हल्ल्यात भारताच्या इंडियन आर्मीला दोषी ठरवत तो म्हणाला, ‘जर जम्मू काश्मीरमध्ये फटाका फुटला तरीही तुम्ही म्हणाल ते पाकिस्तानने केले आहे’. कश्मीरमध्ये तुमची 800,000 सैनिकांची सेना आहे, तरीही असे कसे घडले? तुम्ही नालायक आहात, तुम्ही लोकांना वाचवू शकला नाहीत.

याचबरोबर त्याने भारतीय माध्यमांवर देखील ताशेरे उडवले आहेत. तो म्हणाला, आश्चर्याची गोष्ट आहे की हल्याच्या एका तासानंतर मीडिया बॉलीवूड बदलले आहेत. प्रत्येक गोष्टीला बॉलीवूड बनवू नका. मी आश्चर्यचकित झालो, मी आनंद घेत होतो ज्याप्रकारे ते बोलत होते. मी म्हणत होतो बघा यांचे विचार, हे स्वतःला शिकलेले समजतात.

त्यानंतर पुन्हा त्याने नाव न घेता भारतीय खेळाडूंवर आरोप केले. तो म्हणाला, दोन क्रिकेटर जे भारतासाठी खूप खेळले आहेत. ब्रँड अँबेसिडर सुद्धा राहिलेले आहेत, टॉप क्रिकेटर खेळाडू आहेत. ते पाकिस्तानला दोषी ठरवतात त्याचे पुरावे द्या.

शाहिद आफ्रिदीने कुलभूषण यादव जे सध्या पाकिस्तानच्या जेलमध्ये आहेत आणि अभिनंदन वर्धमान ज्यांना पाकिस्तानी सैनिकांनी पकडल्यानंतर भारतात परत पाठवून दिले, त्यांचे सुद्धा उदाहरण दिले. तो म्हणाला, आम्ही तुम्हाला पुरावे दिले आहेत. एक सध्या आमच्याकडे आहे आणि एकाला आम्ही चहा पिऊन परत केले. आम्हाला पुरावे द्या उगाच आमच्यावर आरोप करू नका.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---