बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीचे असे म्हणणे आहे की, ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानात पराभूत करणे कठीण आहे. भारतीय संघाने 2018- 19 मध्ये ऑस्ट्रेलियाला त्याच्या घरच्या मैदानावर धुळ चारली होती. तेव्हा स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वार्नर संघात नव्हते.
स्मिथ आणि वार्नरला चेंडू छेडछाडी मुळे निंलबीत करण्यात आले होते. त्याचदरम्यान भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये पहली मालिका जिंकली.
मला वाटते की 2020 ची ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणारी कसोटी मालिका भारतासाठी मोठे आव्हान असेल, मला विश्वास आहे की विराटने स्वत: साठी आणि संघासाठी एक स्थर निश्चित केला असेल. कोहलीला कुठे ना कुठे वाटेलच 2018 मधील ऑस्ट्रेलियाचा संघ त्याच्या काळातील सर्वश्रेष्ठ संघ नव्हता, असे गांगुलीने इंडिया टुडेच्या एका विशेष कार्यक्रमात म्हटले आहे.
पुढील वर्षी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे.
गांगुली म्हणाला, “हा दौरा फार दूर नाही. पुढील वर्षी त्याला (कोहलीला) एका वेगळ्या, आणि मजबूत ऑस्ट्रेलिया संघाचा सामना करावा लागणार आहे. भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी विश्वास ठेवावा लागेल.’
‘म्हणूनच हे मी पाहत आहे, तुम्हाला माहित आहे जेव्हा मी कर्णधार झालो होतो, तेव्हा माझे उद्दिष्ट सर्वश्रेष्ठ संघाला पराभूत करणे होते, 2003 मध्ये त्या काळातील मजबूत ऑस्ट्रेलिया संघाविरूद्ध त्यांच्या घरात चांगली कामगिरी केली होती. आताच्या संघाकडे तशी कामगिरी करण्याची क्षमता आहे.
गांगुलीच्या नेतृत्वात भारताने 2003मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली होती, परंतु ऑस्ट्रेलिया त्यांच्या सर्वोत्तम गोलंदाज ग्लेन मॅकग्रा आणि शेन वॉर्नशिवाय खेळत होता.
गांगुली म्हणाला, “भारताकडे वेगवान गोलंदाज आहेत, चांगले फिरकीपटू आहेत. विराट कोहलीसारखा एक चॅम्पियन आहे, एक उत्तम फलंदाज म्हणून अजिंक्य रहाणे आहे, तसेच आता रोहित शर्मा सलामीवीर म्हणून आहे.”
“मी रोहितच्या कामगिरीची वाट पाहत आहे, कारण परदेशी क्रिकेटमधील सलामीवीराची कामगिरी ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे जर भारताने फलंदाजीचा क्रम कायम ठेवला आणि सलामीवीर यशस्वी ठरले तर भारत ऑस्ट्रेलियाच्या या संघाला हरवू शकेल.”
बर्थडे बॉय यशस्वी जयस्वालने केला मोठा कारनामा; टीम इंडियाचीही मालिकेत विजयी आघाडी
वाचा- ????https://t.co/XYqqfUJUiD????
#म #मराठी #Cricket @yashasvi_j
— Maha Sports (@Maha_Sports) December 29, 2019
नवतरुण क्रीडा मंडळ कल्याण पुरुष-महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत आज अंतिम थरार.
वाचा????https://t.co/Sp0lBxD9HY????#म #मराठी #KhelKabaddi— Maha Sports (@Maha_Sports) December 29, 2019