---Advertisement---

IND vs BAN; शानदार विजयानंतर प्रशिक्षकाची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

gautam gambhir
---Advertisement---

भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 3 सामन्यांची टी20 मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत भारताने अनेक रेकाॅर्ड्स आपल्या नावावर करत वर्चस्व गाजवले. भारताने 3-0 ने बांगलादेशला क्लीन स्वीप केले. भारताने बांगलादेशवर मोठा विजय मिळवल्यानंतर आता मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची (Gautam Gambhir) प्रतिक्रिया समोर आली आहे.

बांगलादेशवर भारताच्या ऐतिहासिक 3-0 मालिका विजयानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी सोशल मीडियावर भारतीय संघाचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “आम्हाला आणखी एक विजय मिळाला.”

श्रीलंका दौऱ्यावर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) पहिल्यांदाच भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यावेळी भारतीय संघाने टी20 मालिकेत 3-0 ने मोठा विजय मिळवला होता, तर एकदिवसीय मालिकेत भारताला 2-0 ने निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागला होता. टी20 क्रिकेटबद्दल बोलायचे झाले, तर गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने सलग दुसरी मालिका जिंकली आहे. याआधी भारताने बांगलादेशचा कसोटी मालिकेत 2-0 ने धुव्वा उडवला होता.

भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने बांगलादेशला तिन्ही सामन्यात डोकं वर काढू दिलं नाही. बांगलादेशचा भारत दौरा खूपच खराब राहिला. 2 सामन्यांच्या झालेल्या कसोटी मालिकेतही बांगलादेशला एकही विजय मिळवला आला नाही, तर 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतही बांगलादेश संघ विजयापासून वंचित राहिला.

महत्त्त्वाच्या बातम्या-

बाबरची तुलना कोहलीशी करणं माजी खेळाडूला पडलं महागात! चाहत्यांनी केलं प्रचंड ट्रोल
IND vs NZ; कसोटी मालिकेत किवी फलंदाजाने घातला होता धुमाकूळ! 68 वर्षापासून रेकाॅर्ड कायम
24 वर्षीय फिरकीपटूनं रचला इतिहास! बुमराह-कुलदीप-हार्दिक सर्वांना टाकलं मागे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---