---Advertisement---

कर्णधार असावा असा! ‘या’ दिग्गजांनी केले अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाचे कौतुक

---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान दुसरा कसोटी सामना ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला भारताने केवळ १९५ धावांवर बाद केले. भारताच्या या कामगिरीबद्दल अनेक क्रिकेट पंडितांनी आनंद व्यक्त केला आहे. या सर्वांमध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाचे विशेष कौतुक केले जात आहे.

भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन भारतात परतला असल्याने, उर्वरित सर्व सामन्यांसाठी अजिंक्य भारताचा कर्णधार असणार आहे.

अजिंक्यच्या नेतृत्वाचे कौतुक करताना भारताचे माजी दिग्गज क्रिकेट खेळाडू विरेंद्र सेहवाग यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले, ‘अजिंक्यने गोलंदाजीत उत्तम बदल करत क्षेत्ररक्षकांनाही योग्य ठिकाणी उभे केले होते. गोलंदाजांमध्ये याचा चांगला परिणाम झाला. बुमराह आणि सिराज यांनी उत्तम कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाला पहिल्या इनिंगमध्ये 195 धावांवर बाद करणे विशेष आहे. सामन्यात आघाडी घेण्याचे काम आता पूर्णतः फलंदाजांवर आहे.’

दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाले, ‘भारताने आज उत्तम खेळ केला. गोलंदाजांनी पुन्हा एकदा प्रभावित केले, तर पदार्पण करणाऱ्या दोन्ही खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. अजिंक्यने देखील उत्तम कामगिरी केली असून सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय संघ ॲडीलेड येथील पराभवाला मागे टाकत उत्तम पुनरागमन करत आहे.’

अजिंक्यच्या कामगिरीवर प्रभावित होत ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू शेन वॉर्न म्हणाले ,’ अजिंक्यने उत्तम कामगिरी केलेली आहे.’

या सामन्यात भारताने पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात सर्वबाद केल्यानंतर १ बाद ३६ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

बॉक्सिंग डे कसोटी: न्यूझीलंडच्या केन विलियम्सनने शतक तर केले, पण…

टीम पेनने डाइव्ह मारत एका हाताने पकडला पुजाराचा सुरेख झेल, व्हिडिओ होतोय व्हायरल

याला म्हणतात प्रतिभा! वयाच्या २१ व्या वर्षी शुबमन गिलने केलाय ‘हा’ कारनामा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---