मराठीत एक सुंदर वाक्य आहे की, वेळ कोणाचीही प्रतिक्षा करत नाही. वेळेनुसार व्यक्तीचे वय वाढत जाते आणि वाढत्या वयानुसार मनुष्यांवर कसली-ना-कसली बंधने येत जातात. अगदी क्रिकेटपटूंनाही हिच गोष्ट लागू होते. वाढत्या वयानुसार तंदुरुस्तीमुळे क्रिकेटपटूंना क्रिकेट खेळणे अवघड जाते. त्यामुळे बरेचसे क्रिकेटपटू वेळेपुर्वी किंवा योग्य वेळी निवृत्ती जाहीर करतात. मात्र काही क्रिकेटपटूंनी अनवाश्यकपणे आपली क्रिकेट कारकिर्द ताणली असल्याचेही आपण पाहिले आहे.
या लेखात आम्ही अशाच काही महान क्रिकेटपटूंचा आढावा घेतला आहे, ज्यांच्या कामगिरीत वाढत्या वयानुसार घट होत गेली. तरीही त्यांनी अनावश्यकपणे आपली कसोटी कारकिर्द खेचली.
३. वसीम अक्रम- वसीम अक्रमला कोण विसरु शकेल? त्याच्या स्विंग गोलंदाजीमुळे भल्याभल्या फलंदाजांचाही घाम फुटत जात असे. मधुमेहाचे रुग्ण असूनही वसीम अक्रमच्या चेंडूंची धार कधी कमी झाली नाही. पाकिस्तानच्या या महान गोलंदाजाने १९८५ मध्ये ईडन पार्क मैदानावर आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यानंतर ते १९९९ पर्यंत ९१ कसोटी सामने खेळले व त्यात ३८३ बळी घेतले.
परंतु वय वाढल्याने त्याच्या चेंडूची तीक्ष्णता कमी झाली आणि शेवटच्या १३ कसोटी सामन्यांमध्ये तो केवळ ३१ विकेट घेऊ शकला. २००२मध्ये वसीम अक्रमने कसोटी सामन्यांमधून निवृत्ती घेतली होती. परंतु २००३ च्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत तो वनडेत खेळला होता.
२. रिकी पाँटिंग- २००० च्या दशकाच्या मध्यापर्यंत रिकी पाँटिंग जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक होता. त्याच्या लांब शॉटमुळे तो मोठमोठ्या गोलंदाजांना घाम फोडायचा. ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करताना त्याने बऱ्याच धावा केल्या होत्या आणि ऑस्ट्रेलिया संघाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले होते. परंतु काळानुसार त्याचेही हात सैल झाले.
डिसेंबर २०१० ते डिसेंबर २०१२ या निवृत्तीस योग्य असलेल्या काळात पाँटिंग १८ कसोटी सामन्यात ३४.१२च्या सरासरीने केवळ १०५८ धावा करू शकला. त्याआधी त्याने १५० कसोटी सामन्यांत १२ हजारहून अधिक धावा केल्या होत्या. त्यात त्याने ५४.२७ च्या प्रभावी सरासरीने ३९ शतके ठोकली होती. परंतु दुर्दैवाने त्याची सर्वात मजबूत खेळी करणारा पुल शॉट त्याची कमजोरी ठरला. एवढेच नव्हे तर, त्याचा संघसहकारी खेळलेला मायकेल क्लार्कने नुकताच खुलासा केला होता की, पाँटिंग लवकर निवृत्त झाला नसता; तर ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने त्याला संघातून वगळले असते.
१. सचिन तेंडुलकर- सचिन तेंडुलकरने आपल्या कसोटी कारकीर्दीची सुरूवात १९८९मध्ये केली होती. त्यानतर २०१३ पर्यंत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये विक्रमांचा रतीब घातला होता. तथापि, निवृत्तीपुर्वीच्या काही वर्षांत सचिनची कामगिरी जास्त खास राहिली नव्हती. तेंडुलकरने शेवटच्या २३ कसोटी सामन्यांमध्ये ३२.३४ सरासरीने १२२९ धावा केल्या होत्या. क्रिकेट इतिहासात सर्वाधिक शतकाची नोंद करणारा हा फलंदाज या काळात एकही शतक ठोकू शकला नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या-
वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात १० हजार धावा करणारे मनसबदार, पहिले तीन भारतीय
असे ३ भारतीय फलंदाज, ज्यांना सलामीला संधी मिळाली तर ठरतील ‘आक्रमक ओपनर’
विश्वचषकात सर्वाधिक धावा करत या ३ भारतीयांनी जिंकली होती ‘गोल्डन बॅट’