---Advertisement---

कोहलीच्या टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटमध्ये दबदबा कायम, सलग तिसऱ्यांदा पटकावली मानाची गदा

---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटमध्ये आपला दबदबा मागील तीन वर्षापासून कायम ठेवत सलग तिसऱ्यांदा आयसीसी कसोटी चॅम्पीसनशिपची गदा पटकावली आहे. त्याचबरोबर भारताला १ मिलियन डॉलर्स रकमेचे बक्षीसही देण्यात येणार आहे.

प्रत्येक वर्षी 1 एप्रिलला कसोटी क्रमवारील अव्वल क्रमांकावर असणाऱ्या संघाला रोख बक्षीस आणि आयसीसी कसोटी चॅम्पीसनशिपची गदा देण्यात येते. त्यामुळे गेली तीन वर्षे ही गदा भारताच्याच नावावर राहिली आहे. भारत सध्या 116 गुणांसह कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे.

या क्रमवारी दुसऱ्या स्थानी न्यूझीलंड असून ते 8 गुणांनी भारताच्या मागे आहेत. त्यांना 500,000 डॉलरचे बक्षीस मिळणार आहे. त्यांच्या पाठोपाठ तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाला 200,000 डॉलर तर, चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला 100,000 डॉलरचे बक्षीस जाहीर झाले आहे.

आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनू साव्हनी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे सलग तिसऱ्यांदा आयसीसी कसोटी चॅम्पीसनशिपची गदा पटकावल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

या यशानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला, ‘आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपची गदा पुन्हा एकदा पटकावून अभिमान वाटत आहे. आमचा संघ सर्वच प्रकारात चांगली कामगिरी करत आहे, पण कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवण्याने आणखी आनंद मिळतो. आम्हाला सर्वांना कसोटी क्रिकेटचे महत्त्व माहित आहे.’

‘आमच्या संघात चांगली खोली आहे आणि मला विश्वास आहे की यावर्षी सुरु होणाऱ्या आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिपमध्येही आमचे चांगले प्रदर्शन कायम राहील. आम्ही हे सुरु होण्याची वाट पाहत असून, यामुळे कसोटी क्रिकेटला जास्त महत्त्व मिळेल.’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment