भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीशांतने शुक्रवारी बीसीसीआयला ट्विट करून थेट नाराजगी व्यक्त केली आहे. या नाराजगी मागे मुख्य कारण म्हणजे भारतीय क्रिकेट बोर्डाने श्रीशांतबद्दल केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाला केरळ उच्च न्यायालयाच्या खंडपीठात आव्हान देणार आहे.
याबद्दल त्याने दोन ट्विट केले आहेत. त्यात पहिल्या ट्विटमध्ये श्रीशांत म्हणतो, ” एखाद्या निरपराधी माणसाबरोबर अजून किती वाईट वागणार आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. ते पण नाही तर अनेक वेळा. तुम्ही एवढं वाईट का वागताय माझ्याशी? ”
C mon @bcci this is worst u can do to anyone that too who is proven innocent not just once but again and again..don't know why u doing this?
— Sreesanth (@sreesanth36) August 11, 2017
श्रीशांत पुढे म्हणतो, “बीसीसीआय म्हणते आम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध ठाम भूमिका घेतो. मग राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्सला वेगळी वागणूक का?”
"the board is firm on its zero tolerance policy on corruption and match-fixing," he added.@bcci office?? Then what about csk and Rajasthan?
— Sreesanth (@sreesanth36) August 11, 2017
७ ऑगस्ट रोजी केरळ उच्च न्यायालयाने श्रीशांतवरील २०१३ मध्ये लावलेली बंदी उठवण्यात आली आहे.