भारतात क्रिकेट म्हणजे सर्वकाही असल्याप्रमाणे आहे. इथे कुठेही जाल तिथे तुम्हाला क्रिकेटची चर्चा ऐकण्यास मिळते. भारतात क्रिकेटबद्दल एक वेगळेच वेडेपण आहे. विश्वचषकासारख्या सामन्यावेळी तर,अगदी लोक हातातील सगळी काम बाजूला ठेऊन टीव्हीसमोर थाट मांडून बसतात. पण तुम्हाला माहिती आहे का की, भारतात इतका क्रिकेटप्रती इतके वेडेपण का आहे? खरे तर, याची सुरुवात ३९ वर्षांपूर्वी झाली होती, जेव्हा भारतीय संघाने पहिला विश्वचषक १९८३ साली जिंकला होता. भारतीय क्रिकेटचा तो सुर्वण काळच.
आजच्या दिवशी म्हणजेच २५ जून १९८३ रोजी कपिल देव आणि त्यांचा सहकाऱ्यांनी लॉर्ड्समध्ये इतिहास घडवला होता. विश्वचषक जिंकल्यानंतर कपिल देव यांचा वेस्ट इंडीज संघासोबत एक रोमांचक किस्सा घडला होता, जो फार क्वचित जणांना माहिती असेल.
२५ जून १९८३ रोजी भारतीय संघाने तो कारनामा केला जो कारनामा त्यावेळेस कोणत्याही संघाने केला नव्हता. १९८३ची विश्वचषक स्पर्धा भारतीय क्रिकेटला कलाटणी देणारी ठरली. या विश्वचषकात भारतीय संघाने साखळी सामन्यात बलाढ्य वेस्ट इंडिजला हरविले तेव्हा अख्या जगाला आश्चर्य वाटले होते. त्यानंतर भारतीय संघाला ‘डार्क हॉर्स’ म्हणून संबोधू जाऊ लागले. भारतीय संघाने हळूहळू साखली फेरीत एक एक संघाला हरवून अंतिम सामन्यात प्रवेश केला आणि अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजसारख्या तुल्यबळ संघावर पुन्हा एकदा मात विश्वचषकावर आपले नाव कोरले.
विश्वचषक जिंकल्यानंतर कपिल वेस्ट इंडीजच्या ड्रेसिंग रूममध्ये गेले होते. ड्रेसिंग रूममध्ये गेल्यानंतर त्यांनी वेस्ट इंडीजच्या सर्व खेळाडूंशी हातमिळवणी करताना त्यांनी पाहिले की, पूर्ण ड्रेसिंग रूममध्ये एकच शांतता पसरली आहे. अजूनही वेस्ट इंडीजच्या खेळाडूंना विश्वास बसत नव्हता की, ते विश्वचषकाचा अंतिम सामना हरले आहेत. दरम्यान, त्यांची नजर कोपऱ्यात ठेवेलेल्या शॅम्पीयन बॉटलवर पडली. वेस्ट इंडीजने सामन्याचा ब्रेकमध्ये भरपूर शॅम्पीयनच्या बॉटल आणून ठेवल्या होत्या.
मग कपिल यांनी क्लाईव्ह लॉयड यांना विचारले की, “लॉयड मी या बॉटल घेऊन जाऊ शकतो का?” लॉयड यांनी इशारा करून कपिल यांना सांगितले, “घेऊन जा.” मग काय. कपिल यांच्यासोबत असलेले मोहिंदर अमरनाथ यांनी बॉटल उचलल्या आणि घेऊन ड्रेसिंग रूमबाहेर पडले.
भारतीय संघ लॉर्ड्स मैदानाजवळच्या वेस्टमोरलैंड हॉटेलमध्ये थांबला होते. कपिल यांची पत्नी रोमा एकदा सांगितले होते की, “विजयानंतर भारतीय संघ थांबलेल्या हॉटेलमध्ये रात्रभर धिंगाणा चालू होता. भांगडा डान्स चालू होता आणि मिठाई वाटली जात होती.” रोमासुद्धा सामना पाहण्यासाठी लॉर्ड्स मैदानात गेल्या होत्या. पण भारतीय संघाने खराब फलंदाजी केल्याने त्या नाराज झाल्या आणि हॉटेलमध्ये परतल्या होत्या.
कपिल या विश्वचषकाबद्दल एका मुलाखतीत म्हणाले होते की, “आम्हाला तर उपांत्यफेरी सामना खेळू की नाही याची शंका होती आणि तुम्ही अंतिम सामन्याची वार्ता करत आहात. आम्ही येथे कुटुंबासोबत सुट्टीचा आनंद घेण्याचा विचार केला होता. परंतु, जेव्हा आम्ही वेस्ट इंडिजला साखळी सामन्यात हरविले. तेव्हा आम्हाला वाटलं की, आम्हीही काहीतरी करू शकतो. “
महत्त्वाच्या बातम्या-
लंकादहन करण्यासाठी ‘यंग ब्लू आर्मी’ होतेय सज्ज, बीसीसीआयने शेअर केला खास व्हिडिओ
‘या’ क्रिकेटपटूंचा छंदच न्यारा, आकर्षक मिशीमुळे राहतात चर्चेत; एकाने तर मिशीचा काढलाय विमा
‘या’ क्रिकेटपटूंचा छंदच न्यारा, आकर्षक मिशीमुळे राहतात चर्चेत; एकाने तर मिशीचा काढलाय विमा