मुंबई । मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकातील उपांत्य सामन्यानंतर एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. तब्बल एक वर्षांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चेने जोर धरला होता. शनिवारी धोनीने आपल्या निवृत्तीची घोषणा केल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. धोनी निवृत्त झाल्यानंतर त्याला पर्यायी यष्टीरक्षक कोण यावर चर्चा सुरू झाली.
धोनीला पर्याय म्हणून युवा यष्टिरक्षक रिषभ पंतकडे पाहिले जात होते. कसोटी क्रिकेटमध्ये रिद्धिमान साहा जबाबदारी सांभाळत आहे आणि मर्यादित षटकांत पंतकडे धोनीचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. येत्या तीन वर्षात भारताला तीन विश्वचषक खेळायचे आहेत. अशा परिस्थितीत संघाला अनुभवी यष्टिरक्षकाची आवश्यकता असेल.
पंतबद्दल बोलायचे असेल तर तो खराब फॉर्ममध्ये आहे आणि सतत चुकांची पुनरावृत्ती करत आहे. धोनीच्या जाण्याने पंतवरील तणाव वाढला आहे. जर तो वेळेत स्वत: मध्ये सुधारणा केली नाही तर तीन विश्वचषक बघितल्यास दुसरे कोणीही त्याची जागा घेऊ शकेल. धोनीचे संघातील स्थान मिळविण्यासाठी पंतला कठोर परिश्रम करावे लागतील. चुका टाळाव्या लागतील. वनडेत यष्टिरक्षणांची जबाबदारी पंत की राहूल सांभाळणार हे पंतच्या कामगिरीवर अवलंबून आहे.
गेल्या वर्षीपर्यंत वनडेत यष्टिरक्षक म्हणून धोनीनंतर पंत सर्वांची पहिली पसंती होती, परंतु या वर्षाच्या सुरूवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पंतऐवजी केएल राहुलला संधी देण्यात आली आणि त्यानंतर केएल राहुल यष्टीरक्षक फलंदाज म्हणून पसंती मिळाली. न्यूझीलंड दौर्यावर राहुलची यष्टिरक्षक म्हणूनही निवड झाली.
2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा रिषभ पंत भारताकडून 13 कसोटी, 16 वनडे आणि 28 टी20 सामने खेळला आहे. त्याने कसोटीत 814 धावा, वनडेत 374 धावा आणि टी -20 मध्ये 410 धावा केल्या आहेत. पंत विरोधी संघाला आपली विकेट सहज बहाल करतो, अशी टीकाही त्याच्यावर होते. इतकेच नव्हे तर यष्टीमागे करत असलेल्या निष्काळजीपणामुळेही तो संघात आपले स्थान पक्के करू शकला नाही.
यावर्षी न्यूझीलंड दौर्यावर, साहाच्या जागी पंतला कसोटी मालिकेत संधी देण्यात आली होती, परंतु तो फलंदाजी आणि यष्टीरक्षण या दोन्हीमध्ये अपयशी ठरला. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चार डावात 25 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या होती.
यष्टिरक्षक म्हणून खेळताना राहूलने न्यूझीलंड दौर्यावरील पहिल्या टी 20 सामन्यात 56, दुसऱ्या सामन्यात नाबाद, 57, तिसर्या सामन्यात 27 आणि एक झेल, चौथ्या सामन्यात 39 धावा आणि पाचव्या सामन्यात 45 धावा केल्या. त्याचवेळी न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात नाबाद 88 धावा, दुसर्या वनडेमध्ये 4 आणि तिसर्या वनडेमध्ये 112 धावा आणि एक झेलही घेतला. या कामगिरीच्या जोरावर राहुलचे यष्टिरक्षक म्हणून संघात भक्कम होत आहे तर पंतचे टेन्शन वाढत आहे.