जागतिक क्रिकेटमध्ये असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी क्रिकेटच्या मैदानाबरोबरचं मैदानाबाहेर सामाजिक, राजकिय कामामुळे मोठा सन्मान मिळवला. जगभरातील अनेक क्रिकेटपटूंनी आपल्या तुफानी खेळाला सामाजिक कार्यची जोड दिली.
याचबरोबर अनेक क्रिकेटपटूंच्या बाबतीत असंही पहायला मिळालं की ते मैदानाबाहेरील गोष्टींमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले. काही क्रिकेटपटू हे पबमधील भांडणं, अपघात यामुळे चर्चेत आले. परंतु काही क्रिकेटपटू असेही आहेत किंवा होते, ज्यांच्यावर बलात्कारासारखे गंभीर आरोप झाले. यातील बहुतांश आरोप हे #मीटू #MeToo या सोशल मिडीयावरील चळवळीदरम्यान झाले. तसेच खाजगी लीग क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंवर असे आरोप अनेकवेळा होताना चाहत्यांनी पाहिले आहे.
या लेखात अशाच खेळाडूंची आपण चर्चा करणार आहोत, ज्यांच्यावर शारिरिक अत्याचार केल्याचे आरोप झाले होते.
६. ल्युक पोमर्सबच (Luke Pomersbach )
ऑस्ट्रेलियाकडून एक टी२० सामना खेळलेल्या ल्युक पोमर्सबच या खेळाडूने आयपीएलमध्ये २००८ ते २०१३ दरम्यान १७ सामने खेळले. यात त्याने २७च्या सरासरीने ३०२ धावा केल्या होत्या.
तो राॅयल चॅलेंजर बेंगलोर संघाचा सदस्य असताना त्याच्यावर विनयभंग व हिंसाचाराचे आरोप झाले होते. त्यानंतर त्याला दिल्ली पोलिसांनी अटकही केली होती. काही माध्यमातील वृत्तानुसार कोर्टाची सुनावणी सुरु असताना ल्युक पोमर्सबच तेव्हा भोवळ आली होती.
त्यानंतर ज्या महिलेने त्यावर हे आरोप केले होते, तीने हे आरोप मागे घेतले व गोष्टी कोर्टाच्या बाहेर सोडविण्यात आल्या.
५. रुबेल हसन (Rubel Hossain)
बांगलादेशचा स्टार गोलंदाज रुबेल हसनवरही असे आरोप झाले होते. बांगलादेशकडून त्याने २००९ ते २०२० या काळात २७ कसोटी, २७ टी२० व १०१ वनडे सामने खेळले आहेत.
२०१५विश्वचषकात त्याची संघात निवड झाल्यावर त्याच्यावर बला’त्कारचे आरोप झाले होते. त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली होती. नंतर कोर्टाने त्याला बेल मंजूर केल्यामुळे तो विश्वचषकासाठी रवाना झाला व ६ सामने बांगलादेशाकडून खेळला. यात त्याने ३७.२५च्या सरासरीने ८ विकेट्स घेतल्या. ज्या बांगलादेशी अभिनेत्रीने हे आरोप केले होते, ते तीने पुढे विश्वचषक सुरु असातानाच मागे घेतले होते.
४. अर्जुन रणतुंगा (Arjun Ranatunga)
श्रीलंकेचा महान कर्णधार व १९९६ विश्वचषकाचा हिरो अर्जुन रणतुंगावरही #मीटू #MeToo मोहिमेदरम्यान गंभीर आरोप झाले. लैगिक अत्याचाराचे या महान खेळाडूवर आरोप झाले होते. त्याच्यावर हे आरोप एका भारतीय विमान परिचारिकेने केले होते. तीने याबद्दल थेट फेसबुकवर पोस्ट लिहीली होती.
विशेष म्हणजे रणतुंगा हा श्रीलंका सरकारमध्ये मंत्री असताना त्याच्या मुंबई भेटीदरम्यान हे घडल्याचे आरोप झाले होते.
३. लसिथ मलिंगा (Lasith Malinga)
श्रीलंकेचा माजी टी२० कर्णधार व मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज लसिथ मलिंगावरही विनयभंगाचे आरोप केले होते. हे आरोप करणारी व्यक्ती ही भारतातील मोठी गायिका चिन्मयी श्रीपदाने होती व तीने एका समोर न येणाऱ्या महिलेसाठी हे ट्विट केले होते.
एका अनोळखी महिलेचा लसिथ मलिंगाकडून विनयभंग झाल्याचे आरोप चिन्मयीने ट्विटरवर केले होते. तुझी मैत्रीण माझ्या रुममध्ये आहे असे सांगुन मलिंगाने त्या महिलेला रुममध्ये बोलवले व नंतर तिचा विनयभंग केला. परंतु मलिंगा खूप लोकप्रिय असल्याने ती महिला केस करण्यासाठी पुढे आली नाही, असे चिन्मयीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.
पुढे याबद्दल ना कोणती केस दाखल झाली ना मलिंगाने यावर कोणते भाष्य केले.
Cricketer Lasith Malinga. pic.twitter.com/Y1lhbF5VSK
— Chinmayi Sripaada (@Chinmayi) October 11, 2018
२. मखाया एन्टिनी (Makhaya Ntini)
१०१ कसोटी, १७३ वनडे व १० टी२० सामने दक्षिण आफ्रिकेकडून खेळणाऱ्या मखाया एन्टिनीवरही शारिरिक अत्याचार केल्याचे आरोप झाले होते.
जानेवारी १९९९मध्ये तेव्हा २२ वर्षीय मखाया एन्टिनीवर एका विद्यार्थीनीचा बला’त्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. दक्षिण आफ्रिकेतील इस्ट लंडन शहरात १ डिसेंबर १९९८ रोजी बफेलो पार्क स्टेडियममध्ये ही घटना झाल्याच्या बातम्या तेव्हा वृत्तपत्रात आल्या होत्या.
ती विद्यार्थीनी बफेलो पार्क स्टेडियममध्ये हाऊसकिपींगच काम करत असल्याचे बोलले जात होते. पुढे न्यायालयाने त्याला आरोपांमधून निर्दोष मुक्त केले. ज्या वर्षी त्याने क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते त्याच वर्षी त्यावर हे आरोप झाले होते. निर्दोष मुक्त झाल्यानंतर मात्र मखायाने कधी मागे वळुन पाहिले नाही व क्रिकेटमध्ये शानदार कारकिर्द केली.
१. अमित मिश्रा (Amit Mishra)
भारतीय संघाकडून २२ कसोटी, ३६ वनडे व १० टी२० सामने खेळलेला अमित मिश्रा भारतीय संघातून बाहेर आहे. सप्टेंबर २०१५मध्ये त्यावर लैंगिक आत्याचार, धमकावणे व अन्य आरोप झाले होते. या आरोपाखाली त्याला बेंलगोर शहरात अटक करण्यात आली होती.
सप्टेंबर २०१५मध्ये ही घटना तेव्हा घडली होती, जेव्हा मिश्रा नॅशनल कॅंपसाठी बेंगलोर शहरात आला होता. हाॅटेल रुममध्ये शिवीगाळ करणे व प्राणघातक हल्ला करण्याचे आरोप त्यावर एका महिलेने केले होते. आरोप करणारी महिलेची मिश्राबरोबर ३ वर्षांपासून मैत्री असल्याचे तीने स्वत:च सांगितले होते. तेव्हा मिश्राला लगेच बेल मिळाली होती. पुढे अमित मिश्रावरील ही केस त्या महिलेने मागे घेतली.
अधिक वाचा –