रविवारी (20 ऑगस्ट) भारतीय संघाने जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात आयर्लंडविरुद्धची टी-20 मालिका नावावर केली. मालिकेतील सलग दुसरा सामना भारताने 33 धावांनी जिंकली. दुसऱ्या टी-20 सामन्यात जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट्स घेतल्या. यादरम्यान, अर्शदीप सिंग याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली.
उभय संघांतील या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 185 धावा केल्या. प्रत्युत्तर आयर्लंड संघ 20 षटकांमध्ये 5 बाद 152 धावांपर्यंत मजल मारू शकला. परिणामी भारताने 33 धावांनी विजय मिळवला. रिंकू सिंग (Rinku Singh) याने अवघ्या 21 चेंडूत 38 धावांची खेळी केली, ज्यासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देखील मिळाला. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने घेतलेल्या दोन विकेट्स संघाच्या विजयासाठी महत्वाच्या होत्याच. पण सोबतच त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या 50 विकेट्सही पूर्ण केल्या. अर्शदीप भारतासाठी दुसरा सर्वात कमी सामन्यांमध्ये 50 टी-20आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. यादीत पहिल्या क्रमांकावर कुलदीप यादव आहे.
कुलदीप यादवने अवघ्या 30 सामन्यांमध्ये आणि 638 चेंडूंमध्ये 50 विकेट्स घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर अर्शदीप सिंग याचे नाव नव्याने सामील झाले आहे. अर्शदीपने 50 टीृ20 विकेट्ससाठी 33 सामने खेळले असून 663 चेंडू टाकले. तिसऱ्या क्रमांकावर युझवेंद्र चहल आहे, ज्याने 34 सामन्यांमध्ये 800 चेंडू टाकल्यानंतर 50 विकेट्स मिळाल्या होत्या. चौथ्या क्रमांकावर जसप्रीत बुमराह आहे, ज्याने 41 सामने आणि त्यामध्ये टाकलेल्या 894 चेंडूंनंतर 50 विकेट्स घेतल्या होत्या.
सर्वात कमी चेंडूत 50 टी-20 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारे गोलंदाज
638 – कुलदीप यादव
663 – अर्शदीप सिंग*
800 – युझवेंद्र चहल
894 – जसप्रीत बुमराह
सर्वात कमी सामन्यांमध्ये 50 टी-20 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारे गोलंदाज
कुलदीप यादव – 30
अर्शदीप सिंग – 33*
युझवेंद्र चहल – 34
जसप्रीत बुमराह – 41
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारतासाठी सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने सर्वाधिक 58 धावा केल्या. त्यापाठोपाठ सूज सॅमसन याने 40, तर रिंकू सिंग याने 38 धावांची खेळी केली. सलामीवीर यशस्वी जयस्वाल 18, तर तिलक वर्मा अवघी एक धाव करून बाद झाले. आयर्लंडसाटी सलामीवीर अँडी बालबिर्नी याने सर्वाधिक 72 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. मात्र, त्यानंतर आयर्लंडचा एकही खेळाडू मोठी खेळी करू शकला नाही. (Arshdeep Singh has completed 50 Wickets in T20 Internationals)
महत्वाच्या बातम्या –
ऋतू-रिंकूच्या धमाक्यानंतर गोलंदाजांची कमाल! आयर्लंडला मात देत टीम इंडियाचा मालिकाविजय
क्लास इज पर्मनंट! 47 व्या वर्षी कॅलिसची झंझावाती फलंदाजी, चौकार-षटकारांचा पाडला पाऊस