भारतीय क्रिकेट संघ २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या एशिया कप (Asia Cup) या स्पर्धेमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. दुबईमध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील भारताचा पहिलाच सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. भारत-पाकिस्तान २८ ऑगस्टला आमने-सामने येणार आहेत. या स्पर्धेतील भारताला पाकिस्तान नाहीतर एका दुसऱ्याच संघाकडून चांगली टक्कर मिळणार आहे.
एशिया कप ही महत्वाची स्पर्धा आहे. या स्पर्धेत खेळणाऱ्या संघांना कमी समजणे चुकीचे ठरेल, कारण क्रिकेटच्या मैदानात कोणताही संघ कधीही वरचढ ठरू शकतो. मात्र भारतीय संघाला अशा मोठ्या स्पर्धांमध्ये एका संघाकडून सावध राहणे आवश्यक आहे, तो संघ म्हणजे बांगलादेश.
बांगलादेश स्वत: तर बाहेर जाते आणि दुसऱ्या संघांना पराभूत करत त्यांच्यासाठी अडचणी निर्माण करतात. असे मोठ्या स्पर्धांमध्ये खूपवेळा घडले आहे.
बांगलादेश ठरतोय दुसऱ्या संघासाठी खतरनाक
बांगलादेश नेहमी विरोधी संघांना टक्कर देण्यासाठी ओळखला जातो. त्याचा चांगलाच प्रत्यय दोन वेळा भारतीय संघाला आला आहे. २००७च्या वनडे विश्वचषकात बांगलादेशमुळेच भारत स्पर्धेच्या बाहेर झाला होता. तेव्हा बांगलादेशने भारताला साखळी सामन्यात ५ विकेट्सने पराभूत केले होते. यामुळे करोडो भारतीय निराश झाले होते.
बांगलादेश फक्त भारतालाच नाहीतर इंग्लंडलाही धक्का दिला आहे. त्यांनीच इंग्लंडला २०१५च्या विश्वचषकातून बाहेर केले होते. २०१६च्या टी२० विश्वचषकातूनही बांगलादेशने भारताला जवळपास स्पर्धेबाहेर केले होते. तेव्हा धोनीच्या ऐतिहासिक रनआउटने भारताला पुनरागमन करण्याची संधी मिळाली. हा सामना भारताने १ धावांनी जिंकला होता.
आशिया चषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, आवेश खान.
भारताचे एशिया कप २०२२चे सामने
२८ ऑगस्ट भारत विरूद्ध पाकिस्तान
३१ ऑगस्ट भारत विरुद्ध क्वालिफायर
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बुमराह आशिया चषकातून बाहेर, तरीही टीम इंडियाला नाही चिंता! ‘हा’ खेळाडू आहे कारण
अरे, नक्की चाललंय तरी काय! एशिया कपसाठी आवेश इन, शमी आउट; फॅन्स भडकले निवडकर्त्यांवर
आशिया चषकाचा संघ समोर आल्यानंतर टी-२० विश्वचषकाचे चित्र स्पष्ट? वाचा कसा असेल संघ