वनडे विश्वचषकात भारताला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने मात दिली होती. विश्वचषकानंतर गुरुवारी (23 नोव्हेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिका सुरू झाली. मालिकेतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियसाठी जोश इग्लिस याने वादळी शतक ठोकले. परिणामी ऑस्ट्रेलियाने 20षटकांच्या या सामन्यात मोठी धावसंख्या उभी केली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा पिहला टी-20 सामना विशाखापट्टणममध्ये आयोजित केला गेला. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाज जोश इंग्लिस (Josh Inglis) याच्या धावांवर लगाम लावू शकले नाहीत. अवघ्या 47 चेंडूत इंग्लिसने शतक ठोकले. त्याच्या कारकिर्दीतील हे पहिलेच टी-20 आंतरराष्ट्रीय शतक ठरले. इंग्लिसने ऑस्ट्रेलियासाठी या सामन्यात 50 चेंडूत एकूण 110 धावांचे योगदान दिले. या अप्रतिम फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 3 विकेट्सच्या नुकसानावर 208 धावांपर्यंत मजल मारली.
स्टीव स्मिथ या सामन्यात सलामीला आला असून त्यानेही अर्धशतकी खेली केली. 41 चेंडूत 52 धावा केल्यानंतर स्मिथ धावबाद झाला. सलामीवीर मॅथ्यू शॉर्ट याने 13 धावा करून विकेट गमावली. मार्कस स्टॉयनिस 7*, तर टिम डेविड याने 19* धावांचे योगदान दिले. भारतासाठी प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. प्रसिद्ध कृष्णाने चार षटकात सर्वाधिक 50 धावा खर्च केल्या. (Australia posted 208 for 3 from 20 overs against India in the first T20I)
महत्वाच्या बातम्या –
सूर्यकुमार बनला भारताचा 13वा टी-20 कर्णधार! ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाणेफेक जिंकून घेतली गोलंदाजी
‘मनोबल खचलेले असताना…’, ड्रेसिंग रुममध्ये आलेल्या पंतप्रधान मोदींबाबत शमीची पहिली प्रतिक्रिया