---Advertisement---

बंगळुरूच्या खेळपट्टीमध्ये बिघाड? RCBच्या पराभवानंतर दिनेश कार्तिक कुणावर संतापला?

---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल 2025 स्पर्धेत आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. या दरम्यान त्यांनी तीन विजय मिळवले आहेत आणि दोन वेळा पराभवाचा सामना केला आहे. आरसीबीने त्यांच्या घरेलू मैदानावर म्हणजेच बंगळुरूमध्ये खेळलेल्या दोन सामन्यात पराभव पत्करलेला आहे. त्यांना दिल्ली कॅपिटल्सने सहा विकेटने पराभूत केले होते. आरसीबीच्या पराभवानंतर दिनेश कार्तिकने खेळपट्टीवर त्याचे मत व्यक्त केले आहे. एका रिपोर्टच्या अनुसार कार्तिकने म्हटले आहे की, तो पीच क्युरेटर सोबत बातचीत करणार आहे.

कार्तिकने खेळपट्टीवर प्रतिक्रिया दिली आहे, हिंदुस्तान टाइम्सच्या एका माहितीनुसार कार्तिकने म्हटले आहे, आम्हाला आशा होती की पहिल्या दोन सामन्यात आम्हाला चांगली खेळपट्टी मिळेल. पण येथे फलंदाजी करणे आव्हानात्मक ठरले. आम्हाला जशी परिस्थिती मिळते आम्ही त्या पद्धतीने आमचं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. पण आम्ही पीच क्युरेटरशी बातचीत करू. आतापर्यंत अशी खेळपट्टी मिळाली आहे, ज्यामुळे फलंदाजांना मदत मिळाली नाही.

आरसीबी संघ सध्या पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी पाच सामने खेळले आहेत, त्यामध्ये तीन सामन्यात विजय तर दोन सामन्यात पराभव पत्करला आहे. आरसीबीने कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स, आणि मुंबई इंडियन्सला पराभूत केले होते. तसेच बंगळुरूला गुजरात आणि दिल्ली विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.

आरसीबीसाठी विराट कोहली आणि रजत पाटीदारने चांगलं प्रदर्शन केलं आहे. पाटीदारने पाच सामन्यांमध्ये 186 धावा केल्या आहेत. कोहलीने सुद्धा पाच सामन्यात 186 धावा केल्या आहेत. आरसीबीसाठी जोश हेजलवूडने चांगली गोलंदाजी केली आहे. त्याने 5 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच कृणाल पांड्याने 7 विकेट्स घेतल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---