आज(१३ मार्च) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सध्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील ३ सामन्यांची वनडे मालिका अनिश्चित काळासाठी रद्द केली आहे. जगात वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाची माहिती देताना बीसीसीआयने सांगितले आहे की दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डासह आम्ही असा निर्णय घेतला आहे की सध्या सुरु असलेली वनडे मालिका कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन काही काळानंतर पुन्हा आयोजित करु. सध्या तरी ही मालिका होणार नाही.
त्याचबरोबर बीसीसीआयने सांगितले आहे की दक्षिण आफ्रिकेचा संघ काही काळानंतर ३ सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर पुन्हा येईल. यासाठी बीसीसीआय आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड मालिका पुन्हा आयोजित करण्यासाठी एकत्र काम करेल.
याआधी आज बीसीसीआयने आयपीएलच्या १३ व्या मोसमाला १५ एप्रिलपर्यंत स्थिगिती दिली आहे. त्यामुळे आता २९ मार्चपासून सुरु होणारा आयपीएलचा १३ वा मोसम १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलला गेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–तिच्या एका ट्विटने पुरुष क्रिकेटपटूंना जमीनीवर आणले…
–अखेर ऑस्ट्रेलियाच्या त्या खेळाडूला असणारा कोरोना व्हायरसचा धोका टळला!