नुकत्याच संपन्न झालेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी दमदार राहिली होती. भारतीय संघाने साखळी फेरी व उपांत्य फेरीचा सामना असे सलग दहा सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव केला. या पराभवानंतरही कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाचे कौतुक होत असले तरी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) काहीसा वेगळा विचार करत असल्याचे बोलले जात आहे.
विश्वचषकात रोहित शर्माची वैयक्तिक कामगिरी व नेतृत्व गुण सर्वांनी पाहिले. भारतीय संघाला अंतिम सामन्यात अपयश आले असले तरी रोहितच्या नेतृत्वाचे कौतुक झाले. त्यामुळे तोच संघाचा कर्णधार राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, बीसीसीआय याचबाबत त्याच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते.
रोहितचे सध्याचे वय 36 पेक्षा जास्त असून, आगामी वनडे विश्वचषकाचा विचार केल्यास तोपर्यंत तो चाळीशी पार करेल. त्यामुळे रोहित संघाचा कर्मधार म्हणून कायम राहणार का याबाबत संदिग्धता आहे. रोहित 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीपर्यंत वनडे संघाचा कर्णधार राहू शकतो. तसेच टी20 कर्णधारपदाबाबत यापूर्वीच निवड समिती व रोहित यांची चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. आपला टी20 संघासाठी विचार न केल्यास आपल्याला वाईट वाटणार नाही अशी प्रतिक्रिया रोहितने दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, याबाबत अंतिम निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. अशात रोहित कसोटी संघाचा कर्णधार म्हणून कायम राहील.
त्याचबरोबर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहितचा उत्तराधिकारी कोण असणार? याबाबत विचार करत आहे. सध्या हार्दिक पंड्या हा योग्य पर्याय असला तरी त्याच्या दुखापतीमुळे बीसीसीआय दुसरा पर्याय चाचपून पाहतेय.
(BCCI Discussing With Rohit Sharma On His White Ball Team Captaincy)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING: लखनऊला बाय-बाय करत गंभीर पुन्हा केकेआरच्या ताफ्यात, आगामी IPL साठी बनला मेंटर
“एक लाख 30 हजार लोक शांत झाले आणि…” लॅब्युशेनने सांगितला Final मधील ‘तो’ क्षण