ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUSvSA) यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यावरून क्रिकेटवर्तुळात नव्या वादाला सुरूवात झाली आहे. पाच दिवसांचा हा सामना केवळ दोनच दिवसात कसा काय संपतो? असे प्रश्न विचारले जात आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. हा सामना शनिवारी (17 डिसेंबर) सुरू झाला होता आणि रविवारी (18 डिसेंबर) तो संपला. आता थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या प्रकरणाची दखल घेतली आहे.
ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात चाहत्यांना मनोरंजक सामन्याची अपेक्षा होती. मात्र, सामना दोन दिवस देखील खेळला गेला नाही. साडेपाच सत्रांमध्येच सामन्याचा निकाल लागला. दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन वेळा फलंदाजी केली व 114 षटकात तब्बल 34 फलंदाज बाद झाले. यातील 34 पैकी 26 फलंदाजांना दुहेरी आकडा देखील गाठता आला नव्हता.
आयसीसीने या खेळपट्टीची पाहणी केल्यानंतर आपला अहवाल सादर केला. मॅच रेफ्री एलिट पॅनलचे सदस्य असलेल्या रिची रिचर्डसन यांनी हा अहवाल सादर करताना म्हटले,
“ब्रिस्बेन येथील खेळपट्टीवर बॅट आणि बॉल यांच्या दरम्यान स्पर्धा नव्हती. ही खेळपट्टी गोलंदाजांना अधिक मदत करताना दिसली. क्रिकेटच्या वाढीसाठी ही चांगली गोष्ट नाही. त्यामुळे या खेळपट्टीला सरासरीपेक्षा खराब म्हटले जातेय.”
यासोबतच मैदानाच्या खात्यात एक डी मेरिट गुण जमा झाला आहे. आयसीसीच्या नियमानुसार, एका वर्षात तीनदा अशी घटना घडल्यास एका वर्षासाठी त्या मैदानावर कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळला जात नाही.
या सामन्यात वेगवान गोलंदाजांचे चांगलेच वर्चस्व राहिले. कगिसो रबाडा, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स व एन्रिक नॉर्किए यांचे अनेक चेंडू धोकादायकरित्या खेळपट्टीवर उसळत होते. अनेक माजी क्रिकेटपटूंनी देखील या खेळपट्टीवर टीका केली आहे. तसेच, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर यानेही खेळपट्टी धोकादायक असल्याचे म्हटलेले.
(Brisbane Test Pitch Received Below Average Remark From ICC)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानच्या ‘व्हाईटवॉश’ जखमेवर या क्रिकेट संघाने चोळले मीठ! ट्वीटमध्ये लिहिले, ‘आम्ही पराभवास…’
पाकिस्तानचा डब्ल्यूटीसीमधून खेळ खल्लास, ‘हे’ चार संघ अजूनही गाठू शकतात फायनल