---Advertisement---

PBKS vs Mi: श्रेयस की हार्दिक, कोणाचं रेकॉर्ड दमदार? जाणून घ्या एका क्लिकवर!

---Advertisement---

आयपीएल 2025 (IPL 2025) चा क्वालीफायर-2 सामना पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स (punjab kings vs mumbai indians) संघात खेळला जाणार आहे. दोन्ही संघ या सामन्यात जिंकण्याच्या तयारीने मैदानात उतरतील. कारण या सामन्यातील विजेता संघ अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (Royal Challengers bangaluru) भिडणार आहे. आजचा सामना दोन कर्णधाराच्यामध्ये असणार आहे (today’s match in two captain’s) . श्रेयस अय्यर विरुद्ध हार्दिक पंड्यामध्ये (shreyas iyer vs Hardik pandya) होईल आणि या दोघांवर सर्वांच्या नजरा असणार आहेत.

जर श्रेयसच्या नेतृत्वाखाली आज पंजाबने सामना जिंकला तर तो असा पहिला कर्णधार ठरेल, जो वेगवेगळ्या तीन संघांना अंतिम सामन्यात पोहोचवेल. जर मुंबई जिंकली तर अय्यर नंतर दोन वेगवेगळ्या संघांना आयपीएल फायनलमध्ये पोहोचवणारा हार्दिक दुसरा कर्णधार ठरेल. 2022 पासून अय्यर आणि हार्दिक आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार राहिलेले आहेत आणि दोघांनी एक-एक वेळा त्यांच्या संघाला आयपीएल ट्रॉफी (IPL trophy) जिंकून दिलेली आहे.

श्रेयसने कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये 85 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 47 वेळा संघाला विजय मिळाला आहे, तसेच हार्दिक कर्णधार म्हणून 59 सामने खेळले आहेत ज्यामध्ये संघाने 35 सामने जिंकले आहेत. 2022 नंतर श्रेयसच्या नेतृत्वाखाली 44 सामन्यात त्याने कर्णधारपद भूषवले आहे. ज्यामध्ये संघाने 26 सामने जिंकले आहेत आणि 16 सामने गमावले आहेत. हार्दिकबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 59 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे आणि या दरम्यान 35 सामन्यात संघाला विजय मिळवून दिलेला आहे. तसेच 24 सामने संघाने गमावले आहेत.

आयपीएलमध्ये तीन वेगवेगळ्या संघांसाठी खेळताना श्रेयसने 131 सामनांच्या 130 डावांमध्ये 73.33 च्या सरासरीने 132 स्ट्राईक रेटने 2,363 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 26 अर्धशतके झळकावले आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकही शतक झळकावले नाही.

या हंगामात श्रेयसने आत्तापर्यंत 15 सामन्यात 516 धावा केल्या आहेत आणि त्याची व्यक्तिगत सर्वाधिक धावसंख्या 97 आहे. धावांच्या तुलनेत हा दुसरा हंगाम त्याच्यासाठी चांगला आहे. अय्यर दुसऱ्यांदा कोणत्याही हंगामामध्ये 500 पेक्षा अधिक धावसंख्या करण्यात यशस्वी झाला आहे.

हार्दिकने आयपीएलमध्ये एकूण 151 सामने खेळले आहे. त्यादरम्यान त्याने 10 अर्धशतक झळकावत 2,734 धावा केल्या आहेत, तसेच त्याने 77 विकेट सुद्धा त्याच्या नावावर केल्या आहेत. 5 विकेट घेण्याचा कारनामा सुद्धा केला आहे. सध्याच्या हंगामाबद्दल बोलायचे झाल्यास, 16 सामन्यात त्याने 290 धावा करत 13 विकेट सुद्धा घेतल्या आहेत.

पंजाब किंग्स 2014 मध्ये शेवटच्या अंतिम सामन्यात पोहोचली होती. पंजाबने क्वालिफायर 1 मध्ये कोलकाता विरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला होता. जेव्हा संघाने क्वालिफार 2 मध्ये चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केले होते आणि संघ पहिल्यांदा आयपीएलच्या इतिहासात फायनलमध्ये पोहोचला होता. दुसरीकडे मुंबई इंडियन्स आहेत, ज्या संघाने एकदाही क्वालिफायर 2 मध्ये विजय मिळवला नाही. मुंबईला 2011 मध्ये आरसीबी विरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. तसेच 2023 मध्ये सुद्धा त्यांना गुजरात विरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. तर आजच्या सामन्यात मुंबई इतिहास नवीन रचणार का हे पाहणं चाहत्यांसाठी उत्सुकतेच असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---