आयपीएलमधील यशस्वी संघांबद्दल चर्चा झाल्यास, एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जचे नाव नक्कीच येईल. आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या यशाची इतर कोणत्याही संघाला त्याची पुनरावृत्ती करणे फार कठीण आहे. या यशामुळे चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने भारतीय संघाला अनेक स्टार खेळाडू दिले आहेत. चेन्नई संघात उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर हे भारतीय संघातूनही खेळले आणि यश संपादन केले.
त्या ४ खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, जे चेन्नई सुपर किंग्जच्या संघाकडून दमदार कामगिरी करत भारतीय संघात आले आणि भारतीय संघासाठीही या खेळाडूंचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. भविष्यातही हे खेळाडू भारतीय संघाकडून खेळताना दिसतील.
१. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)
अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा चेन्नई सुपर किंग्ज संघातील महत्वाचा खेळाडू आहे. जडेजाने आपल्या आयपीएल कारकीर्दीची सुरुवात राजस्थान रॉयल्स संघापासून केली, परंतु चेन्नई सुपर किंग्जमधून खेळल्यानंतरच त्याला त्याची ओळख मिळाली. त्यानंतर तो भारतीय संघाकडून खेळला.
रवींद्र जडेजाने ४९ कसोटींमध्ये ३५.२६ च्या सरासरीने १८६९ धावा केल्या. त्याचबरोबर २१३ बळीही घेतले. १६५ वनडे सामन्यात रवींद्र जडेजाने ३१.३९ च्या सरासरीने २२९६ धावा केल्या आणि १८७ बळीही घेतले. रवींद्र जडेजाने ४९ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने देखील खेळले आहेत. जडेजाने टी२० मध्ये १७३ धावा केल्या आणि ३९ बळीही घेतले.
सध्या तो भारताकडून तिन्ही स्वरूपात खेळताना दिसत आहे. ३१ वर्षीय रवींद्र जडेजाला सर्वोत्कृष्ट फिरकी अष्टपैलू खेळाडू म्हणून संबोधले जाते.
२. आर अश्विन (Ravichandran Ashwin)
ऑफ स्पिनर आर अश्विन हा उत्तम आणि यशस्वी गोलंदाज आहे. अश्विनने आयपीएल कारकीर्दीची सुरुवात २००८ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून केली होती. त्याला आयपीएल २००९ मध्ये ओळख मिळाली. त्यानंतर तो भारतीय संघात दिसू लागला. त्याला नंतर सतत संधी मिळत आहे. अश्विन २०११ च्या विश्वचषकातही खेळला.
अश्विनने भारतीय संघासाठी ७१ कसोटी सामन्यांमध्ये २८.११ च्या सरासरीने २३८९ धावा केल्या आहेत आणि ३६५ बळी घेतले आहेत. त्याने १११ वनडे सामन्यात ३२.९१ च्या १५० बळी घेतले आहेत. तर ४६ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात अश्विनने २२.९४ च्या सरासरीने ५२ बळी मिळवले आहेत.
आता अश्विन मर्यादित षटकांच्या स्वरूपात जास्त खेळत नाही. पण कसोटी क्रिकेटमध्ये तो भारतीय संघासाठी प्रमुख फिरकी गोलंदाज आहे.
३. मुरली विजय (Murali Vijay)
मुरली विजयने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये फारसे यश मिळवले नाही. पण कसोटी क्रिकेटमध्ये तो भारतासाठी सलामीवीर म्हणून खेळताना दिसला. मुरली विजयने भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये ६१ सामने खेळले. ज्यामध्ये त्याने ३८.२९ च्या सरासरीने ३९८२ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये १२ शतकांचा समावेश आहे. १७ वनडे सामन्यांमध्ये मुरली विजयने २१.१९ च्या सरासरीने फक्त ३३९ धावा केल्या. ९ टी२० सामन्यांत मुरली विजयने आपल्या फलंदाजीने १६९ धावा जोडल्या आहेत.
विजयचा खेळ मागील काही काळ चांगला होताना दिसत नाही. ज्यामुळे त्याला संघात स्थान नाही. आता त्याचे भारतीय संघात पुनरागमन होणे खूप कठीण वाटत आहे. पण मुरली विजय अजूनही आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा एक भाग आहे.
४. दीपक चहर (Deepak Chahar)
युवा वेगवान गोलंदाज दीपक चहरला भावी सुपरस्टार म्हटले जात आहे. दीपकला कमी संधी मिळाली पण त्याने त्याचा चांगला फायदा उठविला आहे. त्यामुळे दिग्गज त्याची जोरदार स्तुती करताना दिसतात. दीपकला चेन्नई सुपर किंग्जकडून खेळून ओळख मिळाली आहे. त्यानंतर त्याने भारतीय संघाकडून दीपक चहरने आतापर्यंत ३ वनडे सामन्यांमध्ये २ बळी घेतले आहेत.
१० टी-२० सामन्यांत त्याने १४.७६ च्या सरासरीने १७ बळी घेतले आहेत. दरम्यान, त्याचा इकॉनमी रेट ७ आहे. त्यानेने टी-२० स्वरूपात खूप चांगली कामगिरी केली आहे. तो आंतरराष्ट्रीय पुरुष टी२०मध्ये सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणाराही फलंदाज आहे.