भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेत 1-0 ने आघाडीवर असलेल्या भारतीय संघाला लीड्समध्ये तिसऱ्या कसोटीत चांगली सुरुवात करता आली नाही. पहिल्या दिवशी संपूर्ण संघ पहिल्या डावात 78 धावांवर गुंडाळला गेला. यानंतर इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात 432 धावा केल्या आणि 354 धावांची मोठी आघाडी घेतली. प्रत्युत्तरात भारतीय संघ 3 विकेट्सच्या नुकसानानंतर 215 धावांवर खेळत आहे. अशात इंग्लंडचा गोलंदाज क्रेग ओव्हरटनने चौथ्या दिवशी संघाची रणनिती काय असेल, याबद्दल उलगडा केला आहे.
लीड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा चेतेश्वर पुजारा 91 धावांवर खेळत होता. तर कर्णधार विराट कोहलीने 45 धावा केल्या होत्या. इंग्लंडचा संघ चौथ्या दिवशी भारताविरुद्ध कोणत्या रणनीतीत उतरणार आहे? यावर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओव्हरटनने भाष्य केले आहे. भारताने दोन विकेट गमावल्या आणि 200 पेक्षा जास्त धावा केल्या असल्या तरीही त्यांच्या संघाची गोलंदाजी वाईट नव्हती असेही तो म्हणाला.
ओव्हरटन म्हणाला, ‘धावफलकावर फक्त दोन विकेट्स दिसत असल्या तरीही आम्ही त्यापेक्षा खूप चांगली गोलंदाजी केली आहे. भारतीय संघानेही खूप चांगली फलंदाजी केली, हे मान्य करावेच लागेल. आमचा संघ लवकर विकेट घेण्यासाठी ओळखला जातो. आम्हाला तीन किंवा चार विकेट्स मिळायला हव्याच होत्या, पण तस काही झाले नाही.’
ओव्हरटन पुढे म्हणाला, ‘आम्ही या कसोटी सामन्यात अजूनही खूप चांगल्या स्थितीत आहोत, विशेषत: जेव्हा आम्हाला सकाळी नवीन चेंडूने गोलंदाजी करण्याची संधी मिळेल तेव्हा परिस्थिती अजून बदलेल. दुसरा नवा चेंडू खूप महत्त्वाचा असणार आहे. आम्हाला पहिल्या चेंडूपासूनच योग्य ठिकाणी लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करावी लागेल. आम्ही नवीन चेंडूने सकाळी लवकर दोन-तीन विकेट मिळवण्याच्या विचारात आहोत.’
चौथ्या दिवशीच्या सुरुवातीलाच इंग्लंडला मोठी विकेट मिळवण्यात यशही आले आहे. ऑली रॉबिन्सनने 91 धावांवर चेतेश्वर पुजाराला पायचित केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ENGvIND, 3rd Test, Live: चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात, विराट-पुजाराची जोडी उतरली मैदानात
विराटसेना तिसऱ्या डावात गाठणार ५०० धावांचा पल्ला? याआधी हेडिंग्लेमध्येच केली होती ही कामगिरी
‘या’ कारणामुळे मायकल वॉनचा कोहलीला प्रश्न; म्हणाला, ‘याची उत्तरे तुला द्यावीच लागतील’