सध्या जारी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील गाबा क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. मात्र पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. पहिल्या दिवशी केवळ 13.2 षटकेच खेळ झाला. या कालावधीत ऑस्ट्रेलियानं कोणतीही विकेट न गमावता 28 धावा केल्या. सध्या उस्मान ख्वाजा 19 आणि नॅथन मॅकस्विनी 4 धावा करून नाबाद आहेत. या सगळ्या दरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेटनं एक मोठी घोषणा केली. या घोषणेमुळे सामन्याचा आनंद घेण्यासाठी स्टेडियममध्ये गेलेल्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलू शकतं.
वास्तविक, क्रिकेट ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवशी मैदानावर आलेल्या सर्व चाहत्यांना त्यांच्या तिकिटाचे पैसे परत करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या रिफंड पॉलिसीनुसार, एका दिवसात 15 पेक्षा कमी षटकं खेळली गेली आणि निकाल लागला नाही तर प्रेक्षकांना पूर्ण पैसे परत मिळतात.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारतीय वेळेनुसार पहाटे 5.50 वाजता सुरू झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ मात्र अर्धा तास आधी सुरू होईल. बीसीसीआयनं ट्विट केलं की, “ब्रिस्बेनमधील पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे थांबवण्यात आला आहे. उद्या खेळ स्थानिक वेळेनुसार सकाळी 09:50 वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी 5:20 वाजता)) सुरू होईल. उद्या किमान 98 षटके टाकायची आहेत.
14 डिसेंबर रोजी ब्रिस्बेनमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दिवसभरात एकूण 66.2 मिमी पावसाची नोंद झाली. हवामान खात्यानं आधीच पावसाचा अंदाज वर्तवला होता, तो खरा ठरला. रविवारीही पावसाची 50 टक्के शक्यता आहे. हवामान खात्यानं सोमवार ते बुधवारपर्यंत आणखी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून, त्यामुळे खेळावर परिणाम होऊ शकतो.
हेही वाचा –
IND vs AUS; गाबा कसोटीचा दुसऱ्या दिवसाचा खेळही पावसामुळे बिघडणार? जाणून घ्या हवामान अंदाज
असं कोण आऊट होतं भाऊ! केन विल्यमसननं मारली स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड, VIDEO व्हायरल
वेस्ट इंडिज मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर कॅरेबियन संघासोबत रंगणार थरार