लंडनच्या द ओव्हल स्टेडियमवर इंग्लंड आणि भारत यांच्यात चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण केलेले दिसले आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांनी मागच्या सामन्याप्रमानेच या सामन्यातही भारतीय संघाला स्वस्तात गुंडाळले आहे. केवळ १९१ धावांवर संपूर्ण भारतीय संघ तंबूत परतला आहे. भारतीय संघातील वरच्या फळीतील महत्वाचे फलंदाज संघासाठी काहीच कमाल करू शकले नाहीत.
अशात, संघाचा अष्टपैलू रविंद्र जडेजा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या आधी फलंदाजीसाठी मैदानात आला होता. त्यामुळे अनेकांना याचे कारण जाणून घ्यायचे आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी याचे कारण स्पष्ट केले आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहली नेहमीच त्याच्या घेतलेल्या निर्णयांनी सर्वांना आश्चर्यंचकित करत असतो. असेच त्याने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीतही केले आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताच्या पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला होता. त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे उपकर्णधार अजिंक्य रहाणे फलंदाजीसाठी येईल असे सर्वांना वाटत होते. मात्र, मैदानात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला रवींद्र जडेजा. मैदानात तो पाचव्या स्थानावर फलंदाजीसाठी आल्याने सर्वांना आश्चर्य वाटले.
जडेजा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यानंतर गावसकर काय म्हणाले?
भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर या सामन्यासाठी समालोचन करत आहेत. त्यांनी विराटने घेतलेल्या या निर्णयाचे कारण स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी सांगितले की, जडेजा दुसऱ्या टोकावर डावे-उजवे समीकरण तयार करण्यासाठी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.
गावसकर म्हणाले की, “जडेजा लेफ्ट-राइट काॅम्बिनेशन आणि गोलंदाजांची लाइन खराब करण्यासाठी क्रमांक पाचवर फलंदाजीसाठी आला आहे. जडेजाने या मालिकेत चांगली खेळी केली आहे आणि खेळपट्टीवर टिकून राहण्याचेही काम केले आहे. दुसरीकडे रिषभ पंत या मालिकेत लयात दिसला नाही. पण मला नाही माहित की, रहाणेला वर खेळायला का नाही पाठवले. एकंदरीत चित्र पाहून असे वाटते की, तो फलंदाजी करण्यासाठी तयार नाहीये.”
असे असले तरीही, तो कर्णधाराच्या अपेक्षांवर खरा उतरु शकला नाही. ३४ चेंडूंमध्ये केवळ १० धावा करत क्रिस वोक्सच्या गोलंदाजी जो रूटच्या हातून तो झेलबाद झाला.
इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतील जडेजाचे प्रदर्शन
या कसोटी मालिकेतील पाच डावात जडेजाने आतापर्यंत एकूण १३३ धावा केल्या आहेत. मालिकेत जडेजाने २६.६ च्या सरासरीने या धावा केल्या आहेत. यामध्ये त्याचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन ५६ धावा असे आहे. जडेजा कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत एकूण तीन वेळा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘लेडिज इन ओव्हल’; भारतीय खेळाडूंचे प्रदर्शन पाहण्यासाठी पत्नी अन् प्रेयसींचा स्टेडियममध्ये जमावडा
इंग्लंडच्या भेदकतेपुढे शार्दुलचे झंझावती अर्धशतक, त्याच्या धमाकेदार खेळीमागे ‘हे’ आहे गुपित