भारतीय क्रिकेट संघ मागील काही काळापासून विदेशात सातत्यपूर्ण कामगिरी करतोय. ऑस्ट्रेलियाच्या मागील दोन्ही दौऱ्यात भारताने कसोटी मालिका विजय साजरे केले आहेत. तसेच, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर देखील भारतीय संघाची कामगिरी चांगली राहिलेली. त्याचवेळी 2021 इंग्लंड दौऱ्यावेळी भारताने लॉर्ड्स कसोटीत विजय साजरा केला होता. या विजयाचे श्रेय आता भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरूण यांनी अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याला दिले.
भारतीय संघाने या मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स येथे झालेला. या सामन्यात भारतीय संघाने 151 धावांनी मोठा विजय साजरा केलेला. या सामन्यातील केएल राहुल याचे शतक, जसप्रीत बुमराह-मोहम्मद शमी यांची भागीदारी व मोहम्मद सिराज याच्या गोलंदाजीची चर्चा होते. मात्र, आता त्यावेळी भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक असलेल्या भरत अरुण यांनी या यशाचे श्रेय ईशांत शर्मा याला दिले. एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले,
“त्या कसोटीच्या पहिल्या डावात जेव्हा जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांची भागीदारी होत होती त्यावेळी ईशांत चांगलाच संतापलेला. लंच ब्रेकमध्ये तो ड्रेसिंग रूममध्ये आला व त्याने टोपी फेकली. यांना बाद करण्यासाठी काय करायला हवे असे त्याने विचारले. तेव्हा मी सातत्य ठेवा असे म्हटलो. त्यावर तो म्हणाला कधीपर्यंत सातत्य ठेवायचे? आक्रमकताही दाखवावी लागेल. त्यावर मी म्हटलो सातत्य म्हणजे केवळ एका जागी गोलंदाजी करणे नव्हे. आक्रमकपणे गोलंदाजी करूनही सातत्य दाखवता येते.”
यानंतर त्याने मैदानावर गेल्यावर बेअरस्टो, मोईन अली व सॅम करन यांना बाद केले होते. भारताने या सामन्यात विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतलेली. पुढचा सामना इंग्लंडने जिंकत बरोबरी साधली. मात्र चौथ्या सामन्यात भारतीय संघाने पुन्हा विजय मिळवलेला. या मालिकेतील अखेरचा सामना एक वर्षानंतर खेळला गेला. तो सामना जिंकत इंग्लंडने मालिका बरोबरीत सोडवली.
(Former India Bowling Coach Bharat Arun Said Lords Test Win Credit Goes To Ishant Sharma)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंदोर कसोटीत विराट करणार खास क्लबमध्ये एन्ट्री! यापूर्वी भारताकडून फक्त द्रविडच मानकरी
इंदोर नव्हेतर थेट अहमदाबाद कसोटीचा प्लॅन करतोय रोहित! WTC फायनलबाबत म्हणाला, “तयारी आता…”