भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढत पहिल्याच दिवशी रंगली आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्टीव स्मिथ आणि ट्रेविस हेड या दोघांनी ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत पोहोचवले. दोघांच्या नाबाद द्विशतकी भागीदारीने ऑस्ट्रेलिया सामन्यात आघाडीवर पोहोचला आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकल्यानंतरही या सामन्यात पुढे होण्याची संधी गमावल्यानंतर, भारताचे माजी क्रिकेटपटू फारूक इंजिनियर यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा व फलंदाजांवर बोचरी टीका केली आहे.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हिरव्या दिसणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांना फारसे यश मिळाले नाही. पहिला गडी लवकर बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने दिवसाअखेर 3 बाद 327अशी मोठी मजल मारली. या पहिल्या दिवसाच्या खेळानंतर बोलताना इंजिनियर म्हणाले,
“मला वाटते भारतीय कर्णधार व फलंदाज त्या खेळपट्टीला घाबरले. प्रथम फलंदाजीचा निर्णय हा केवळ ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांसमोर आपली कमजोरी दिसायला नको म्हणून, घेतला गेला आहे.”
ओव्हल मैदानाची ही खेळपट्टी दोन दिवसांपासून चांगली चर्चेत आली होती. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना फायदा होईल असे म्हटले जात होते. मात्र, पहिल्या एका तासानंतर खेळपट्टी फलंदाजांना पोषक दिसली.
इंजिनियर यांनी यावेळी चेतेश्वर पुजारा याचे कौतुक केले. ते म्हणाले,
“चेतेश्वर पुजारा हा संघाचा सर्वोत्तम फलंदाज वाटतो. त्याला मी हुकमाचा एक्का म्हणेल. ससेक्स काउंटी संघासाठी तो चांगली कामगिरी करत आला आहे. इंग्लंडमध्ये खेळण्याचा त्याचा अनुभव संघाच्या कामी येईल.”
त्याचवेळी इंजिनियर यांनी विराट कोहली व शुबमन गिल यांना देखील दर्जेदार फलंदाज म्हणत स्तुती केली. ऑस्ट्रेलियाने उभारलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय फलंदाज कशी फलंदाजी करतात हे पाहावे लागणार आहे.
(Former India Cricketer Farukh Engineer Slams Indian Batters In WTC Final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जोडी जबरदस्त! स्मिथ-हेडची नजर 99 वर्ष जुन्या विक्रमावर, भारतीय गोलंदाजांना करावी लागणार प्रयत्नांची पराकाष्टा
न्यूझीलंडचा केंद्रीय करार आला समोर, दिग्गज खेळाडू बाहेर तर वेगवान गोलंदाजाचे पुनरागमन