भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना शुक्रवारी (3 मार्च) समाप्त झाला. इंदोरच्या होळकर स्टेडियवर खेळल्या गेलेल्या सामन्यात खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल होती. परिणामी दोन्ही संघाचे फलंदाज अपेक्षित धावा करताना दिसले नाहीत. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यातील भारतीय संघाच्या पराभवानंतर माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने आपली नाराजी व्यक्त केली.
मालिकेतील पहिले दोन सामने एकतर्फी जिंकलेला भारतीय संघ पहिल्या डावात केवळ 109 धावा करू शकलेला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात उत्तम फलंदाजी करत 88 धावांची आघाडी मिळवली. भारतीय संघाने दुसऱ्या डावात 163 धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी 76 धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान पार करताना ऑस्ट्रेलियाने इंदोर कसोटी (Indore Test) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फक्त एक बळी गमावत 18.5 षटकातच 78 धावा करून सामना जिंकला. यासह मालिका देखील 2-1 अशा फरकावर आली.
भारतीय संघाच्या या पराभवानंतर बोलताना समालोचक व भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग म्हणाला,
“तुम्ही मायदेशात असे होऊ शकत नाही. मला वाटते इथे कर्णधार म्हणून रोहित थोडासा कमी पडला. कारण, तुमच्याकडे इतर पर्याय असताना देखील तुम्ही सर्वांवर विश्वास दाखवला नाही. अश्विन आणि जडेजा उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत. मात्र, त्यांच्याकडून काही न झाल्यास अक्षर पटेलला थोडी संधी द्यायला हवी होती. अश्विनला चेंडू आवडला नव्हता. तरीदेखील त्याने दहा षटके टाकली.”
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात केवळ 18.3 षटकात विजयासाठी मिळालेले 76 धावांचे आव्हान पार केले. मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथे होईल.
(Harbhajan Singh Upset After India Defeat In Indore Test Question Rohit Captaincy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मेस्सीचा जीव धोक्यात! कुटुंबाच्या सुपरमार्केटवर हल्लेखोरांकडून गोळीबार, स्टार फुटबॉलपटूला धमकी
ब्रेकिंग! विश्वचषकात विक्रमी खेळी करणारा दिग्गज फुटबॉलपटू काळाच्या पडद्याआड, क्रीडाविश्वावर शोककळा