---Advertisement---

हार्दिक पंड्याचा भिमपराक्रम, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

---Advertisement---

ब्रिस्टल | रविवारी (८ जुलै) ब्रिस्टल येथिल कौंटी क्रिकेट मैदानावर  झालेल्या भारत-इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने इंग्लंडवर ७ गडी राखून विजय  मिळवला.

शतकवीर रोहित शर्मा आणि अष्टपैलू  हार्दिक पंड्या भारताच्या या विजयाचे शिल्पकार ठरले.

याचबरोबर अष्टपैलू हार्दिक पंड्याने एकाच टी-२० सामन्यात ४ बळी आणि फलंदाजीत ३० धावा करणारा पहिला भारतीय आणि जगातील सातवा क्रिकेटपटू ठरला आहे.

अनुभवी भुवनेश्वर कुमार आणि चायनामन कुलदीप यादवच्या अनुपस्थितीत नवख्या भारतीय गोलंदाजांची धुलाई करत २० षचकात ९ बाद १९८ धावा केल्या होत्या.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पहिल्या दहा षटकात भारतीय गोलंदाजांची तुफान धुलाई करत धावफलकावर दोन बाद १११ धावा लावल्या होत्या.

एकवेळ अशी आली होती की इंग्लंड आरामात २५० धावांच्या आकडा पार करेल.

मात्र इंग्लंडच्या डावाच्या १३ व्या षटकाात हार्दिकने इंग्लडचा कर्णधार इऑन मार्गन आणि अॅलेक्स हेल्सला बाद करत इंग्लंडच्या धावगतीला लगाम घातला.

त्यानंतरही पंड्याने १८ व्या षटकात बेन स्टोक्स आणि जॉनी बेअस्ट्रोला बाद करत इंग्लंडला २०० धावांच्या आत रोखण्यासाठी महत्वाची भुमिका निभावली.

तर फलंदाजी करताना हार्दिकने झटपट १४ चेंडूत ३३ धावांची खेळी केल्याने भारताने इंग्लंडचे १९९ धावांचे आव्हान ३ गड्यांच्या मोबदल्यात १८.४ षटकात पूर्ण करत तीन टी-२० सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली.

महत्वाच्या बातम्या-

-एमएस धोनीसाठी आजचा दिवस ठरला खास; केले हे 3 विश्वविक्रम

-असा विक्रम करणारा रोहित शर्मा पहिला भारतीय!

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment