आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू रिषभ पंत सध्या त्याच्या खराब प्रदर्शनातून जात आहे. मागच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार रिषभ पंत सातव्या स्थानावर फलंदाजी करण्यासाठी आला,तेव्हा फक्त दोन चेंडू उरले होते. याआधी तो बाउंड्री जवळ उभा राहिला होता आणि तो खूप नाराज दिसत होता. याविषयी माजी खेळाडू हरभजन सिंग सुद्धा आश्चर्यचकित आहे. त्यांनी प्रश्न विचारला आहे की, रिषभला फलंदाजी करण्यासाठी कुणी अडवले होते?
हरभजन सिंगने त्याचा यूट्यूब चॅनेलवर म्हटले की, लखनऊ संघामध्ये काही ना काही तर नक्कीच झाले आहे, ज्यामुळे रिषभ पंत नाराज दिसत होता.
हरभजन सिंगने म्हटले, रिषभ पंतने सातव्या स्थानावर फलंदाजी का केली हेच मला समजत नाही? रिषभने सातव्या स्थानावर फलंदाजी करणे हे योग्य आहे का? अब्दुल समद, आयुष बडोनी यांनी त्याच्या आधी येऊन फलंदाजी केली. हा निर्णय कोणाचा होता? हे एकतर संघात ठरवून केले असावे किंवा हा पंतचा निर्णय असावा. रिषभ पंत रागात होता कदाचित त्याला कोणीतरी असं काहीतरी म्हटलं असावं ज्यामुळे तो आनंदी नव्हता.
तो पुढे म्हणाला , हे माझे मत आहे. रिषभ पंत बद्दल काही चर्चा झाली ज्यामुळे कदाचित तो नाराज असेल. आम्ही रिषभला चांगल्या प्रकारे ओळखतो. तो एक चांगला मुलगा आहे, जो अनुभवी खेळाडूंचा आदर करतो. पण काय बरोबर आहे? जर रिषभ फॉर्ममध्ये नाही तर ,तुम्ही त्याला सातव्या स्थानावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात पाठवता? तो तुमच्या संघाचा कर्णधार आहे, तुम्ही त्याला टॉस करण्यासाठी पाठवता हे मला अजिबात आवडले नाही. जर कर्णधार आनंदी नसेल तर संघ कसा जिंकू शकतो.
रिषभ पंत या हंगामात फॉर्ममध्ये दिसला नाही. त्याने 9 सामनांमध्ये फक्त 106 धावा केल्या आहेत. फक्त एका सामन्यात त्याने 63 धावा केल्या होत्या. लखनऊ संघ प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लढाई लढत आहे. संघाने 9 मधील 5 सामने जिंकले आहेत आणि संघ सध्या सहाव्या स्थानावर आहे. त्यांचे आता 5 सामने राहिले आहेत. ज्यामधील त्यांना 4 सामने जिंकणे गरजेचे आहे. लखनऊचा पुढचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध 27 एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये 27 एप्रिल रोजी दुपारी 3:30 वाजता खेळला जाणार आहे.